शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाळूचे डंपर उठले निष्पापांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाळू वाहतूक करणारी वाहने निष्पाप लोकांच्या जिवावर उठले असून, कमी वेळेत जास्त पैसा कमाविण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाळू वाहतूक करणारी वाहने निष्पाप लोकांच्या जिवावर उठले असून, कमी वेळेत जास्त पैसा कमाविण्याच्या नादात अपघाताच्या घटना घडत आहेत. महिनाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने तीन जणांना बळी घेतला आहे. शनिवारी सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे दोन जीव एकाच दिवशी गेले, तर मागील महिन्यातही दोघांचा बळी गेला होता. विशेष म्हणजे सर्वच अपघात महामार्गावर झाले असून, त्यातील तीन बळी हे इच्छादेवी चौकातच गेले आहेत.

गेल्या महिन्यात ९ मार्च रोजी इच्छादेवी चौकात दुचाकीने कंपनीत जात असताना वाळूच्या डंपरने दिलेल्या धडकेत सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (५७, रा.सिंधी कॉलनी) हे जागीच ठार होते, तर अक्षय विजय पाटील (३०, रा. शिवमनगर, निमखेडी परिसर) हा तरुण जखमी झाला होता. दहा दिवसांनंतर त्याचीही प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर ३ एप्रिल रोजी पुन्हा इच्छादेवी चौकातच मॉर्निंग वॉकला गेलेल्या ॲड. सतीश शंकर परदेशी यांनाही अज्ञात वाहनानेच चिरडले. घटनास्थळावरील काही लोकांच्या मते ॲड. परदेशी यांनाही वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनेच धडक दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ विनोद वेडू चौधरी (४२, रा.कुंभारखेडा, ता.रावेर) यांच्याही दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा जीव गेला. या घटनेतील हिरव्या रंगाचे डंपर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याच डंपरने आणखी एका दुचाकीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. त्यातही दोन जण जखमी झाले आहेत. वर्षभरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेत ६० च्या वर निष्पाप लोकांचा जीव जात आहे. ९ मार्चच्या अपघातात तर १८ वर्षांच्या मुलाच्या हाती डंपरचे स्टेअरिंग दिल्याचे उघड झाले होते, ते कायद्याने चुकीचे असल्याचे आरटीओंनीच मान्य केले होते.

कमी वेळेत जास्त खेपा अन‌् त्यातच धोका

वाळू माफियांकडून कमी वेळेत जास्त खेपा टाकण्याचे चालकाने सांगितले जात आहे. त्यात चालकांना दोन पैसे जास्तीचे मिळतात. त्यामुळे डंपर चालक रस्त्यावर कोणाचीही तमा न बाळगता सुसाट वेगाने डंपर चालवतात, त्यात अशा प्रकारे अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. भरदिवसा महामार्गावरून वाळूचे डंपर वापरत असताना त्यांना ना पोलिसांकडून अडविले जाते ना महसूल व आरटीओकडून. या यंत्रणेच्या डोळ्यादेखत ही वाहतूक होत असताना त्याकडे डोळेझाक केली जाते. ग्रामीण भागातून आलेल्या दुचाकी, चारचाकीची पोलिसांकडून तपासणी केली जाते, तर दिवसाला चार-पाचशे रुपये कमाविणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून आरटीओकडून मर्दूमकी दाखविली जाते. मात्र, वाळूच्या ओव्हरलोड वाहनांकडे कानाडोळा केला जातो.

वर्षभरात ५१२ वाहनधारकांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने चालू आर्थिक वर्षात ५१२ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ७० लाखांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय चेकपोस्टवर ४८२ वाहनांवर कारवाई करून तेथेही ६५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ला दिली.

असे आहेत वाळू वाहतुकीच्या वाहनामुळे झालेले बळी

९ मार्च : सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (वय ५७, सिंधी कॉलनी)

१९ मार्च : अक्षय विजय पाटील (वय ३०, रा. शिवमनगर)

३ एप्रिल : ॲड. सतीश शंकर परदेशी (४३, रा. शिवाजीनगर)

३ एप्रिल : विनोद वेडू चौधरी (४२, रा.कुंभारखेडा, ता. रावेर).