शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे डंपर उठले निष्पापांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाळू वाहतूक करणारी वाहने निष्पाप लोकांच्या जिवावर उठले असून, कमी वेळेत जास्त पैसा कमाविण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाळू वाहतूक करणारी वाहने निष्पाप लोकांच्या जिवावर उठले असून, कमी वेळेत जास्त पैसा कमाविण्याच्या नादात अपघाताच्या घटना घडत आहेत. महिनाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने तीन जणांना बळी घेतला आहे. शनिवारी सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे दोन जीव एकाच दिवशी गेले, तर मागील महिन्यातही दोघांचा बळी गेला होता. विशेष म्हणजे सर्वच अपघात महामार्गावर झाले असून, त्यातील तीन बळी हे इच्छादेवी चौकातच गेले आहेत.

गेल्या महिन्यात ९ मार्च रोजी इच्छादेवी चौकात दुचाकीने कंपनीत जात असताना वाळूच्या डंपरने दिलेल्या धडकेत सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (५७, रा.सिंधी कॉलनी) हे जागीच ठार होते, तर अक्षय विजय पाटील (३०, रा. शिवमनगर, निमखेडी परिसर) हा तरुण जखमी झाला होता. दहा दिवसांनंतर त्याचीही प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर ३ एप्रिल रोजी पुन्हा इच्छादेवी चौकातच मॉर्निंग वॉकला गेलेल्या ॲड. सतीश शंकर परदेशी यांनाही अज्ञात वाहनानेच चिरडले. घटनास्थळावरील काही लोकांच्या मते ॲड. परदेशी यांनाही वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनेच धडक दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ विनोद वेडू चौधरी (४२, रा.कुंभारखेडा, ता.रावेर) यांच्याही दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा जीव गेला. या घटनेतील हिरव्या रंगाचे डंपर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याच डंपरने आणखी एका दुचाकीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. त्यातही दोन जण जखमी झाले आहेत. वर्षभरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेत ६० च्या वर निष्पाप लोकांचा जीव जात आहे. ९ मार्चच्या अपघातात तर १८ वर्षांच्या मुलाच्या हाती डंपरचे स्टेअरिंग दिल्याचे उघड झाले होते, ते कायद्याने चुकीचे असल्याचे आरटीओंनीच मान्य केले होते.

कमी वेळेत जास्त खेपा अन‌् त्यातच धोका

वाळू माफियांकडून कमी वेळेत जास्त खेपा टाकण्याचे चालकाने सांगितले जात आहे. त्यात चालकांना दोन पैसे जास्तीचे मिळतात. त्यामुळे डंपर चालक रस्त्यावर कोणाचीही तमा न बाळगता सुसाट वेगाने डंपर चालवतात, त्यात अशा प्रकारे अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. भरदिवसा महामार्गावरून वाळूचे डंपर वापरत असताना त्यांना ना पोलिसांकडून अडविले जाते ना महसूल व आरटीओकडून. या यंत्रणेच्या डोळ्यादेखत ही वाहतूक होत असताना त्याकडे डोळेझाक केली जाते. ग्रामीण भागातून आलेल्या दुचाकी, चारचाकीची पोलिसांकडून तपासणी केली जाते, तर दिवसाला चार-पाचशे रुपये कमाविणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून आरटीओकडून मर्दूमकी दाखविली जाते. मात्र, वाळूच्या ओव्हरलोड वाहनांकडे कानाडोळा केला जातो.

वर्षभरात ५१२ वाहनधारकांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने चालू आर्थिक वर्षात ५१२ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ७० लाखांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय चेकपोस्टवर ४८२ वाहनांवर कारवाई करून तेथेही ६५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ला दिली.

असे आहेत वाळू वाहतुकीच्या वाहनामुळे झालेले बळी

९ मार्च : सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (वय ५७, सिंधी कॉलनी)

१९ मार्च : अक्षय विजय पाटील (वय ३०, रा. शिवमनगर)

३ एप्रिल : ॲड. सतीश शंकर परदेशी (४३, रा. शिवाजीनगर)

३ एप्रिल : विनोद वेडू चौधरी (४२, रा.कुंभारखेडा, ता. रावेर).