शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

संभाजी राजेंनी एकतर उडी घेवू नये, अन् घेतली तर माघार घेवू नये - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 3:38 PM

Bachchu Kadu : बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव : एखाद्या निवडणुकीत किंवा इतर राजकीय गोष्टींमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी एकतर उडी घेतलीच नको पाहिजे, आणि जर उडी घेतली असेल तर माघार घेवूच नये’ असा सल्ला राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. संभाजीराजे हे एक तर राजे आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याबाबत आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणे उचीत नाही. मात्र, आता छत्रपतींनी निवडणुकीत उडी टाकली, आणि माघारदेखील घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची पुढील भूमिका काय राहिल? हे देखील तेच सांगू शकतात असे ही त्यांनी सांगितले.

बोरा यांनी केले राज्यमंत्र्यांचे पाय धुवून स्वागतबच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नीलेश बोरा यांच्या चौघुले प्लॉट भागातील निवासस्थानी मंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी बोरा यांनी बच्चू कडू यांचे पाय धुवून स्वागत केले. त्यानंतर बोरा यांच्या कुंटूंबियांनी बच्चू कडू यांचे औक्षण केले. कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या स्वागताने ते भारावले होते. मात्र, अशाप्रकारे पाय धुवून स्वागत करणे हे वेदनादायी आहे. पण, नीलेशने ऐकले नाही, असेही ते म्हणाले.

ईडीचे संकट टाळण्यासाठी राणांना हनुमान चालीसाराज्यातील इतर मंत्र्यांप्रमाणेच नवनित राणांना ईडीची नोटीस आली होती. मात्र, त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. राणा यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, असा कार्यक्रम केंद्र शासनाकडूनच राणा यांना देण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर ईडी गायब झाल्याचे सांगत बच्चू कडू यांनी भाजप व राणा यांना टोला लगावला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती