शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:12 AM

मनवेल, ता. यावल : गॅसचे सिलिंडर आता जवळपास तब्बल नऊशे रुपयांत मिळू लागल्यामुळे सामान्य नागरिकांना हा महागाईचा ...

मनवेल, ता. यावल : गॅसचे सिलिंडर आता जवळपास तब्बल नऊशे रुपयांत मिळू लागल्यामुळे सामान्य नागरिकांना हा महागाईचा भार सोसवेनासा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात आता पुन्हा चुली पेटू लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी महिलांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.

पूर्वीही चुलींचाच वापर प्रामुख्याने ग्रामीण भागात असायचा. मात्र, घरातील निघणारा धूर कमी व्हावा व महिलांना फुप्फुसाचा त्रास होऊ नये, तसेच जंगल तोड कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत घराघरात गॅस पोहोचले आहे. मात्र, आता सिलिंडररचे दर एकदमच वाढल्यामुळे अनेक घरांमध्ये गॅसचे रिकामे सिलिंडर आता रिकामेच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गॅसचा काही दिवसच मिळाला आनंद

शासनाकडून फक्त शंभर रुपयांत गॅस कनेक्शन मिळाल्याने, काही दिवस आनंद मिळाला. आता मात्र गॅसचे सिलिंडर भरण्यासाठी नऊशे रुपये लागत असल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेकांसाठी ही रक्कम मोठीच आहे. त्यामुळे सिलिंडर ‘शोपीस’ ठरले असून, गॅसचा आनंद काही दिवसांसाठीचाच ठरला.

ग्रामीण भागात स्थिती बिकट

ग्रामीण भागात कोविड १९ ची परिस्थिती व पावसाने दांडी मारल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. काम नाही, धंदा नाही. जेमतेम मजुरी मिळत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा तरी करावा लागत आहे. सिलिंडर भरण्यासाठी पैसा जमा करण्यांचे अशा अनेक गरिबांसमोर जणू आव्हाणच आहे. ८६० रुपयाचा सिंलेडर व ३० रुपये भाडे असे ८९० रुपयात भरलेले सिलिंडर मिळत असल्यामुळे महिला पुन्हा चुली पेटवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत शंभर रुपयात गॅस कनेक्शन मिळाले. काही दिवसांत गॅसच्या वापर करण्याची सवय पडली. दोन महिने एक सिलिंडरचा वापर होत होता. सबसिडी मिळत असल्यामुळे सिलिंडर भरणे परवड होते. मात्र, शासनाने सिलिंडर वरील सबसिडी जवळपास बंदच केल्याने, आता महागडे सिलिंडर परवड नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.

- कस्तुराबाई कोळी, शेतमजूर महिला, मनवेल.