शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे यकृत देऊन वाचविले कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:57 IST

मुंबईत दुर्मिळ शस्त्रक्रीया यशस्वी: समाजासमोर आदर्श

जळगाव : स्वत:चे कुंकू वाचविण्यासाठी कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी, एक महिला खूप मोठा त्याग करू शकते, याचीच प्रचिती जळगावात आली़ स्वत:चे यकृत पतीला दान करून शारदा अनिल केºहाळे यांनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे़ त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, डॉक्टरांचे परिश्रम व यश, सामाजिक घटकांकडून मिळालेले सहकार्य या सर्व बाबी जुळून आल्याने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनिल केºहाळे यांची मरणयातनेतून सुटका झाली. त्यांना नवजीवन मिळाले आहे़़अनिल केºहाळे हे दोन मुले व पत्नीसह जळगावात स्थित आहे़ दोन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता़ औरंगाबादच्या तपासणी केली असता त्यांना या आजाराचे निदान झाले व मुंबईत जाण्याचा सल्ला देण्यात आला. यकृत खराब झाल्याचे कळाल्यावर केºहाळे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुंबई, पुणे, हैद्राबाद, अशा अनेक ठिकाणी यकृतासाठी अर्ज केले़ मात्र हाती काहीही लागले नाही़ पती व परिवारावरीले संकट दूर सारण्यासाठी पत्नी शारदा यांनी धाडसाचे पाऊल उचलत यकृतदान करण्याचा निर्णय घेतला़ यासाठी मुंबईतील केºहाळे यांच्या सहकारी मिनल पटेल यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला़सोशल मीडियाने जोपासली सामाजिक बांधिलकीतब्बल २२ लाखांचा खर्च या शस्त्रक्रियेला आला़ अशा स्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या केºहाळे परिवाराच्या मदतीला अनेक हात धावून आलेत़ यात भवरलाल जैन ट्रस्ट, बाफना ट्रस्ट, साई ट्रस्ट, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आजी माजी पदाधिकारी, काही मंत्र्यांकडून त्यांना मदत मिळाली़ यासह सोशल मीडियावर मित्रमंडळींच्या माध्यमातून झालेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी त्यांना मदत केली़ सोशल मीडियातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली गेली़ गरीब रूग्णांना अशा अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया शासकीय योजनांमध्ये व्हाव्यात, अशी अपेक्षा केºहाळे दाम्पत्याने केली आहे़१८ तासांची अवघड शस्त्रक्रियाशारदा व अनिल केºहाळे रूग्णालयात दाखल झाले़ २ जुलै रोजी ही अवघड व दूर्मिळ शस्त्रक्रिया झाली़ यात सर्वात आधी शारदा यांच्यावर १५ तास शस्त्रक्रिया झाली त्यानंतर यकृत अनिल यांना बसविण्यासाठी १८ तासांची जिकरीची शस्त्रक्रिया झाली़ तीन दिवस दोघेही बेशुद्ध होते़अवयवदान होणे गरजेचेअवयवदानाने कुणाचाही जीव वाचू शकतो, याचे महत्त्व व यासंदर्भातील लोकांचे गैरसमज दूर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे़ त्यामुळे अवयवदान करावेच, लोकांनी यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे़ मागणी मोठ्या प्रमाणात असताना दाते लवकर उपलब्ध होत नाहीत, अशा स्थितीत अवयवदानाचे प्रमाण वाढावे व जीव वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केºहाळे दाम्पत्याने केले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव