शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

स्वत:चे यकृत देऊन वाचविले कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:57 IST

मुंबईत दुर्मिळ शस्त्रक्रीया यशस्वी: समाजासमोर आदर्श

जळगाव : स्वत:चे कुंकू वाचविण्यासाठी कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी, एक महिला खूप मोठा त्याग करू शकते, याचीच प्रचिती जळगावात आली़ स्वत:चे यकृत पतीला दान करून शारदा अनिल केºहाळे यांनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे़ त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, डॉक्टरांचे परिश्रम व यश, सामाजिक घटकांकडून मिळालेले सहकार्य या सर्व बाबी जुळून आल्याने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनिल केºहाळे यांची मरणयातनेतून सुटका झाली. त्यांना नवजीवन मिळाले आहे़़अनिल केºहाळे हे दोन मुले व पत्नीसह जळगावात स्थित आहे़ दोन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता़ औरंगाबादच्या तपासणी केली असता त्यांना या आजाराचे निदान झाले व मुंबईत जाण्याचा सल्ला देण्यात आला. यकृत खराब झाल्याचे कळाल्यावर केºहाळे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुंबई, पुणे, हैद्राबाद, अशा अनेक ठिकाणी यकृतासाठी अर्ज केले़ मात्र हाती काहीही लागले नाही़ पती व परिवारावरीले संकट दूर सारण्यासाठी पत्नी शारदा यांनी धाडसाचे पाऊल उचलत यकृतदान करण्याचा निर्णय घेतला़ यासाठी मुंबईतील केºहाळे यांच्या सहकारी मिनल पटेल यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला़सोशल मीडियाने जोपासली सामाजिक बांधिलकीतब्बल २२ लाखांचा खर्च या शस्त्रक्रियेला आला़ अशा स्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या केºहाळे परिवाराच्या मदतीला अनेक हात धावून आलेत़ यात भवरलाल जैन ट्रस्ट, बाफना ट्रस्ट, साई ट्रस्ट, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आजी माजी पदाधिकारी, काही मंत्र्यांकडून त्यांना मदत मिळाली़ यासह सोशल मीडियावर मित्रमंडळींच्या माध्यमातून झालेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी त्यांना मदत केली़ सोशल मीडियातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली गेली़ गरीब रूग्णांना अशा अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया शासकीय योजनांमध्ये व्हाव्यात, अशी अपेक्षा केºहाळे दाम्पत्याने केली आहे़१८ तासांची अवघड शस्त्रक्रियाशारदा व अनिल केºहाळे रूग्णालयात दाखल झाले़ २ जुलै रोजी ही अवघड व दूर्मिळ शस्त्रक्रिया झाली़ यात सर्वात आधी शारदा यांच्यावर १५ तास शस्त्रक्रिया झाली त्यानंतर यकृत अनिल यांना बसविण्यासाठी १८ तासांची जिकरीची शस्त्रक्रिया झाली़ तीन दिवस दोघेही बेशुद्ध होते़अवयवदान होणे गरजेचेअवयवदानाने कुणाचाही जीव वाचू शकतो, याचे महत्त्व व यासंदर्भातील लोकांचे गैरसमज दूर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे़ त्यामुळे अवयवदान करावेच, लोकांनी यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे़ मागणी मोठ्या प्रमाणात असताना दाते लवकर उपलब्ध होत नाहीत, अशा स्थितीत अवयवदानाचे प्रमाण वाढावे व जीव वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केºहाळे दाम्पत्याने केले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव