शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पारोळा तालुक्यातील ४७ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:10 IST

पारोळा तालुक्यात एकूण ४७ गावांना मे महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे२८ गावांना टँकरने तर १३ गावांना विहीर अधिग्रहणसहा गावांना टँकर मागणी प्रस्तावआचारसंहितेचा पाणीटंचाईवर मोठा परिणाम

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : तालुक्यात एकूण ४७ गावांना मे महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यात या टंचाईवर मात करण्यासाठी २८ गावांना टँकरने, तर १३ गावांना खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तब्बल एक महिना आचारसंहिता लागू असल्याने कृती आराखड्यात सुचविण्यात आलेली कामे ठप्प पडली. यामुळे तालुक्यातील ५० टक्के गावे पाणीटंचाईत होरपळूून निघाली.तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेली गावेवडगाव प्र.अ, मंगरुळ, पोपटनगर, खोलसर, भोंडणदिगर, धाबे, वडगाव, चहुत्रे, सांगवी, मेहू, टेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, मोहाडी, तरडी, पळासखेडे,कनेरे, खेडीढोक बाभळेनाग, धुळपिंपी, तरवाडे, देवगाव, पिंपळभेरव, लोणी बुद्रूक, लोणीसीम, वाघरावाघरी, लोणी खुर्द गावांना पाणीटंचाई समस्या निर्माण झाली असल्याने या २८ गावांना २० खाजगी तर २ शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जामदा, कंकराज, रत्नापिंप्री, बाहुटे, नगाव, महाळपूर या गावांंनी पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असल्याने टँकरची मागणी केली आह.े पंचायत समितीकडून उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अमळनेर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.तर खाजगी विहीर अधिग्रहित केलेली गावे व विहीर मालकआंबापिंप्री-शेतकरी भिकन सखाराम पाटील, भिलाली-भिकन सखाराम पाटील, महाळपूर-कमलाबाई संतोष पाटील, जिराळी मंदाबाई मोहन करंजे, शेवगे बुद्रूक कंकराज बुडीत क्षेत्रातील विहीर शेळावे खुर्द प्रकाश यादव पाटील, दगडी सबगव्हान रमेश वामन पाटील, चिखलोड खुर्द, पीतांबर कपूरचंद पाटील, नेरपाट, संतोष पुंडलिक पाटील फ, हिरापूर दोधू महारू पाटील, नगाव हिंमत श्रावण पाटील, धाबे राजेंद्र बाबूराव पाटील उडणीदिगर येथे शालीग्राम संतोष पाटील य आदींच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.टंचाईग्रस्त गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संभाव्य खालील योजना कृती आराखड्यात सुचविण्यात आल्या आहेत. आंबापिंप्री, पिंपळकोठा, मोहाडी, दहीगाव या गावांना तात्पुरता नळ पाणीपुरवठा योजना, मोंढाले प्र.उ., हिवरखेडासीम, मोरफळ, शिवरे, शिरसमनी, वंजारी, लोणीसीम, रताळे, हिरापूर तरवाडे, बाबळेनाग, मोरफळी, विटनेर सावखेडेहोळ, सावखेडेमराठ या गावांना-पूर्ण केलेल्या नळ योजना दुरुस्ती करणे हे सुचविण्यात आले आहे. इंधवे कंकराज, पिंपळभीरव, रत्नापिंप्री, सांगवी पुनगाव, सारवे बुद्रूक, वाघरा वाघरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे असे सुचविण्यात आले आहे .उडणी दिगर -नळ योजना दुरुस्ती करणे, करमाड बुद्रूक शेवडी खोदणे, कोळपिंप्री -खाजगी विहीर अधिग्रहित करणे, खेडीढोक, धुळपिंप्री येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत आराखड्यात सुचविण्यात आल्या आहेत, अशी माहिती अभियंता संदीप सोनवणे यांनी दिली.तालुक्यातील बोरी म्हसवे या दोन्ही धरणात मृत साठा पाण्याचा शिल्लक आहे. बोरी धरणावर पारोळा शहरासह ४८ गावांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे आणि तालुक्यातील सुमारे १३ गावांना टँकरने होणार पाणीपुरवठा होण्यासाठी टँकर बोरी धरणातून भरले जात आहे. भोकरबारी, कंकराज, सावरखेडे, शिरसमनी, इंदासी, खोलसर, लोणी एमआय टॅन्क या लघु प्रकल्पात पाणीच नाही. हे प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत.अजून २ महिने कसे पार पडतील, असा मोठा प्रश्न प्रशासना समोर उभा आहे. पारोळा शहरालाही १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरवाशीय यामुळे त्रस्त झाले आहेत. विकतचे थंड पाण्याचे जार घ्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईParolaपारोळा