शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जळगावातील महापालिका रुग्णालयांची सुरक्षा ‘राम भरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 11:57 IST

गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक नाही

ठळक मुद्देशिपायांवर सुरक्षेची मदारसहा सुरक्षा रक्षकांची आवश्यकता

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेल्या महापालिकेच्या रुग्णालये व तेथे येणाऱ्या रुग्णांची सुरक्षा वाºयावर आहे. गेल्या तीन वर्षांपासून मनपा रुग्णालयांसाठी सुरक्षा रक्षकच नाही. विशेष म्हणजे त्यासाठी वारंवार मागणी करूनही मनपा प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे.मनपाच्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करीत विविध कामांना नकार मिळणे आता शहरवासीयांसाठी नित्याचे झाले आहे. त्यात शहराच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाचे रुग्णालयदेखील सुटलेले नाही.वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची कमतरता असो की इमारतीची दुरवस्था अशा बिकट परिस्थितीत मनपाच्या रुग्णालयांचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात रुग्णालय व रुग्णांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तीनही रुग्णालये वाºयावरशहरात सध्या शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालय, सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता व नानीबाई रुग्णालय असे महापालिकेचे तीन रुग्णालये आहेत. या तीन रुग्णालयांसोबतच पूर्वी शाहू महाराज रुग्णालयात हेदेखील मनपाचे मोठे रुग्णालय होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरक्षा रक्षकांच्या ठेक्याची मुदत संपली व रुग्णालयांना त्यानंतर सुरक्षा रक्षक मिळालेच नाही. तेव्हापासून ही रुग्णालये वाºयावर आहे. यातील शाहू महाराज रुग्णालय आता मनपाकडे नसले तरी ते हस्तांतरीत करण्यापूर्वी दर महिन्याला १५० ते १७५ प्रसूती होणाºया या रुग्णालयातही साधारण दोन वर्षे सुरक्षा रक्षक नव्हते.रुग्णांच्या सुरक्षेचे काय ?चेतनदास मेहता रुग्णालय व नानीबाई रुग्णालय या ठिकाणी केवळ ओपीडी चालते. मात्र शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात प्रसूतीदेखील होतात. त्यामुळे या रुग्णालयात सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे. अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या व सतत वर्दळ असणाºया जिल्हा रुग्णालयातून एक महिन्याचे बाळ पळवून नेल्याची घटना घडली होती तरीदेखील मनपा त्यापासून काही बोध घेत नाही का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. येथे नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रुग्णांमधून होत आहे. रुग्णांसोबतच रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न असला तरी मनपाने ही रुग्णालये वाºयावर सोडून दिली आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.सहा सुरक्षा रक्षकांची आवश्यकताशिवाजीनगरातील डी.बी. जैन या एकाच रुग्णालयाचा विचार केला तर येथे सहा सुरक्षा रक्षकांची आवश्यता असल्याचे सांगितले जात आहे. एका पाळीमध्ये (शिफ्ट) किमान दोन सुरक्षा रक्षक या ठिकाणी आवश्यक आहे.शिपायांना करावी लागतात सुरक्षा रक्षकाची कामेसुरक्षा रक्षक नसल्याने डी.बी. जैन रुग्णालयातील शिपायांवरच रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असून ते शिपायांच्या कामासह सुरक्षा रक्षकाचीही कामे पाहतात. शिपायांची कामे करीत असताना रुग्णालय परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास काय करणार, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.रुग्णालयासाठी सुरक्षा रक्षक मिळण्याबाबत वरिष्ठांकडे कळविण्यात येऊन तशी मागणीही करण्यात आली. मात्र अद्याप सुरक्षा रक्षक मिळालेले नाही.- डॉ. राम रावलानी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा रुग्णालय.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव