शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून दोनच दिवस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST

कोरोना परिणाम : प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबई ते दिल्ली नियमित धावणाऱ्या राजधानी ...

कोरोना परिणाम : प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई ते दिल्ली नियमित धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी आठवड्यातून फक्त दोनच दिवस सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनामुळे गेल्या आठवडाभरापासून अनेक गाड्यांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या ३० जूनपर्यंत स्थगित केल्या आहेत. यात जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या पाच रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

तसेच आता राजधानी एक्स्प्रेसलाही गेल्या आठवडापासून प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ७ मे पासून ही गाडी आता दर शनिवारी आणि मंगळवारी असे आठवड्यातून दोनच दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीहून परतीच्या प्रवासासाठी दर बुधवारी आणि रविवारी धावणार आहे.

इन्फो :

३० जूनपर्यंत दोनच दिवस धावणार

रेल्वे प्रशासनाने कोरोनामुळे ही गाडी ३० जूनपर्यंत अशा पद्धतीने आठवड्यातून दोनच दिवस चालविण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यावरच ही गाडी दररोज धावणार आहे. दरम्यान, सध्या या गाडीच्या वेळापत्रकात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.