शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रेल्वे भुयारी मार्गाला सापडला मुहूर्त; शेतकऱ्यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:13 IST

भादली रेल्वे गेटजवळ कामास सुरुवात : सात गर्डर टाकले, १५ एप्रिलपर्यंत होणार काम पूर्ण

जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून या कामाला सुरूवात झाली आहे. या मुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या मार्गासाठी सात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

रेल्वे विभागाने सन २०१७मध्ये भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी ‘लोकमत’ने भादली रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांविषयीचा पूर्ण लेखाजोखा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सोबतच नशिराबाद येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठविला होता. रेल्वे फाटक बंद न करता आहे त्याच ठिकाणाहून भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर नशिराबादकरांना दिलासा मिळाला. मात्र अनेक वर्षे उलटूनही कामाला सुरुवात होत नव्हती. यामुळे  नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना लांबच्या मार्गाने शेतात ये-जा करावी लागत आहे. या विषयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह गावातील अन्य लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेऊन भादली रेल्वे गेट फाटकाच्या समस्येबाबत व्यथा कथन केली. खासदार  पाटील यांनी  प्रत्यक्ष पाहणी करून मुंबई येथील रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

मान्सूनपूर्वी मार्ग होणार खुला?या ठिकाणी आतापर्यंत एकूण सात गर्डर टाकण्यात आले आहे. आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी माती खोदण्याचे काम सध्या सुरू आहे.  येत्या १५ एप्रिल पर्यंत भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती रेल्वे निर्माण विभागाचे  उपअभियंता पंकज धाबारे यांनी ‘लोकमत’ला दिली. येत्या मान्सूनपूर्वी हा मार्ग खुला करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी पोकलेनच्या साह्याने खोदकाम सुरू असून मजुरांकडूनही या ठिकाणी काम सुरू आहे. 

खासदारांचे खडे बोल२५ फेब्रुवारी रोजी डीआरएम, खासदार उन्मेष पाटील व नशिराबादच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली. खासदारांनी या कामास विलंब होत असल्याबद्दल संताप व्यक्त‍ करीत अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. बोगद्याचे काम होत नाही तोपर्यंत गेट खुले करा, अशा सूचना यावेळी दिल्या.  यानंतर तातडीने सुत्रे फिरली व कामाला सुरुवात झाली.  

भुयारी मार्गाला न्याय मिळाल्याचे समाधानजळगाव, जामनेर, पाचोरा, यावल या चार तालुक्यांना जोडणारा हा  मार्ग कायमस्वरूपी बंद होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार होते. भादली रेल्वे गेट परिसरात सुमारे दीड ते दोन हजार एकर जमीन नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांची आहे. ती कसण्यासाठी त्यांना अवघड झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांची व्यथा मांडली होती. भुयारी मार्गाबाबत तब्बल सहा वर्ष लढा दिल्यानंतर आज न्याय मिळाला याचे समाधान असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.भादली रेल्वे गेट संदर्भात कामाला गती यावी यासाठी विविध राजकीय पक्षांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केले. अखेर त्याला यश आले आहे

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगावFarmerशेतकरी