शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

रेल्वे भुयारी मार्गाला सापडला मुहूर्त; शेतकऱ्यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:13 IST

भादली रेल्वे गेटजवळ कामास सुरुवात : सात गर्डर टाकले, १५ एप्रिलपर्यंत होणार काम पूर्ण

जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून या कामाला सुरूवात झाली आहे. या मुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या मार्गासाठी सात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

रेल्वे विभागाने सन २०१७मध्ये भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी ‘लोकमत’ने भादली रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांविषयीचा पूर्ण लेखाजोखा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सोबतच नशिराबाद येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठविला होता. रेल्वे फाटक बंद न करता आहे त्याच ठिकाणाहून भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर नशिराबादकरांना दिलासा मिळाला. मात्र अनेक वर्षे उलटूनही कामाला सुरुवात होत नव्हती. यामुळे  नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना लांबच्या मार्गाने शेतात ये-जा करावी लागत आहे. या विषयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह गावातील अन्य लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेऊन भादली रेल्वे गेट फाटकाच्या समस्येबाबत व्यथा कथन केली. खासदार  पाटील यांनी  प्रत्यक्ष पाहणी करून मुंबई येथील रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

मान्सूनपूर्वी मार्ग होणार खुला?या ठिकाणी आतापर्यंत एकूण सात गर्डर टाकण्यात आले आहे. आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी माती खोदण्याचे काम सध्या सुरू आहे.  येत्या १५ एप्रिल पर्यंत भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती रेल्वे निर्माण विभागाचे  उपअभियंता पंकज धाबारे यांनी ‘लोकमत’ला दिली. येत्या मान्सूनपूर्वी हा मार्ग खुला करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी पोकलेनच्या साह्याने खोदकाम सुरू असून मजुरांकडूनही या ठिकाणी काम सुरू आहे. 

खासदारांचे खडे बोल२५ फेब्रुवारी रोजी डीआरएम, खासदार उन्मेष पाटील व नशिराबादच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली. खासदारांनी या कामास विलंब होत असल्याबद्दल संताप व्यक्त‍ करीत अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. बोगद्याचे काम होत नाही तोपर्यंत गेट खुले करा, अशा सूचना यावेळी दिल्या.  यानंतर तातडीने सुत्रे फिरली व कामाला सुरुवात झाली.  

भुयारी मार्गाला न्याय मिळाल्याचे समाधानजळगाव, जामनेर, पाचोरा, यावल या चार तालुक्यांना जोडणारा हा  मार्ग कायमस्वरूपी बंद होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार होते. भादली रेल्वे गेट परिसरात सुमारे दीड ते दोन हजार एकर जमीन नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांची आहे. ती कसण्यासाठी त्यांना अवघड झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांची व्यथा मांडली होती. भुयारी मार्गाबाबत तब्बल सहा वर्ष लढा दिल्यानंतर आज न्याय मिळाला याचे समाधान असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.भादली रेल्वे गेट संदर्भात कामाला गती यावी यासाठी विविध राजकीय पक्षांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केले. अखेर त्याला यश आले आहे

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगावFarmerशेतकरी