शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

माणुसकीवरच प्रश्चचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील विलास भाऊलाल पाटील...

‘भर रस्त्यात, ज्यांचे नाव घेण्यात आम्ही स्वत:ला धन्य समजतो अशा छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर दोन मस्तवाल गावगुंड एका असाह्य तरुणीला बदडत असतील आणि सभोवतालचा नपुंसक समाज उघड्या डोळ्यांनी फक्त गंमत पाहतो.या जमावात सामान्य माणसापासून तथाकथित राजकीय पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांचाही समावेश असतो. ही अत्यंत दुर्दैवी, लाजीरवाणी आणि आम्ही माणूस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. ही एकच नव्हे अशा असंख्य घटना आमच्या सभोवताली रोज घडत असतात आणि मला माझ्या माणुसपणाची लाज वाटते नव्हे तर घृणा येते. अशा माणुसपणाला पशुची किंवा जनावरांची उपमा देणे हासुद्धा मला त्या मुक्या जिवांचा अपमान वाटतो. कारण आजचा तथाकथित माणूस जसा वागतो आहे तसा पशुसुद्धा कधी वागत नाही. जनावरालाही एक निसर्ग निर्मित चौकट आहे आणि अपवादात्मक परिस्थिती वगळता ही चौकट तो कधीच मोडत नाही. पण तथाकथित माणसाने सर्वच चौकटी मोडून कधीच भंगाराच्या भावात विकून टाकल्या आहेत.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे आम्ही, कोरडी पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याच्या मागे, तुपाची वाटी घेऊन धावणाºया आणि मरणासन्न गाढवाला गंगेचे पाणी पाजणाºया संत एकनाथ महाराजांचा जयघोष करत कथा कीर्तनात नाचणारे आम्ही, ‘खरा तो एकचि धर्म-जगाला प्रेम अर्पावे ! ही पूज्य सानेगुरूजींची प्रार्थना रोज शाळेत उच्चारून म्हणणारे आम्ही.‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे साळसुदपणे आळवणारे आम्ही. आमचा खरा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत. उपासना पद्धतीला धर्म ठरवून त्यासाठी रक्तपातासह सिद्ध असणारे आम्ही. ‘खºया माणुसकी धर्माला’ पार विसरुन गेलो आहोत. मी उच्च पातळीवरच्या किंवा अध्यात्मिक पातळीवरच्या माणुसकी धर्माबद्दल अजिबात बोलत नाहीये. मी रोजच्या व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. समाजात, शेजारी-पाजारी, गल्लीत, गावात एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही कसे राहतो? कसे वागतो? याचा विचार तर करा! आई, वडील, गुरूजन, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा सन्मान करणे ही माणुसकी, सुसंस्कृतपणा. पण जे जमत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. गर्दीच्या ठिकाणी प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी वृद्ध नागरिक, महिला, अंध, अपंग, लहान मुले यांच्याशी थोडी तरी सौजन्याची वागणृक ठेवा. त्यांना ढकलू नका, धक्का मारून पुढे जावू नका, किमान एवढे तर सौजन्य ठेवा. गर्दीत आपले वाहन पुढे दामटणे, रेल्वेगेट उघडल्यावर अतीघाईने वाहन पुढे घुसवण्याचा प्रयत्न करणे, चालत्या वाहनातून, मोटारबाईकवरून गुटखा खावून पचकन थुंकणे आणि कुणी बोलले तर त्याला शिवीगाळ करणे, धमकावणे ही संस्कृती तरी नका बनवू. तरुण मुले आणि तरुण मुली आज बिनदिक्कतपणे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक बगीचे, रस्ते या ठिकाणी बिभत्स वर्तन करताना महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांचे भान ठेवणे तर सोडाच पण उलट त्यांना निर्लज्जपणे सामोरे जातात. निदान ते तरी करू नका. व्हीडीओ शुटींग आणि फोटोग्राफीमध्ये धन्यता मानली जाते. यामुळे आम्ही माणूस आहोत का? या गोष्टीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ आज तर काळ खूपच बदलला आहे आणि बहिणाबार्इंचा हा प्रश्न अधिकच टोकदार झाला आहे. आमचा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत.- विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव