शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

माणुसकीवरच प्रश्चचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील विलास भाऊलाल पाटील...

‘भर रस्त्यात, ज्यांचे नाव घेण्यात आम्ही स्वत:ला धन्य समजतो अशा छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर दोन मस्तवाल गावगुंड एका असाह्य तरुणीला बदडत असतील आणि सभोवतालचा नपुंसक समाज उघड्या डोळ्यांनी फक्त गंमत पाहतो.या जमावात सामान्य माणसापासून तथाकथित राजकीय पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांचाही समावेश असतो. ही अत्यंत दुर्दैवी, लाजीरवाणी आणि आम्ही माणूस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. ही एकच नव्हे अशा असंख्य घटना आमच्या सभोवताली रोज घडत असतात आणि मला माझ्या माणुसपणाची लाज वाटते नव्हे तर घृणा येते. अशा माणुसपणाला पशुची किंवा जनावरांची उपमा देणे हासुद्धा मला त्या मुक्या जिवांचा अपमान वाटतो. कारण आजचा तथाकथित माणूस जसा वागतो आहे तसा पशुसुद्धा कधी वागत नाही. जनावरालाही एक निसर्ग निर्मित चौकट आहे आणि अपवादात्मक परिस्थिती वगळता ही चौकट तो कधीच मोडत नाही. पण तथाकथित माणसाने सर्वच चौकटी मोडून कधीच भंगाराच्या भावात विकून टाकल्या आहेत.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे आम्ही, कोरडी पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याच्या मागे, तुपाची वाटी घेऊन धावणाºया आणि मरणासन्न गाढवाला गंगेचे पाणी पाजणाºया संत एकनाथ महाराजांचा जयघोष करत कथा कीर्तनात नाचणारे आम्ही, ‘खरा तो एकचि धर्म-जगाला प्रेम अर्पावे ! ही पूज्य सानेगुरूजींची प्रार्थना रोज शाळेत उच्चारून म्हणणारे आम्ही.‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे साळसुदपणे आळवणारे आम्ही. आमचा खरा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत. उपासना पद्धतीला धर्म ठरवून त्यासाठी रक्तपातासह सिद्ध असणारे आम्ही. ‘खºया माणुसकी धर्माला’ पार विसरुन गेलो आहोत. मी उच्च पातळीवरच्या किंवा अध्यात्मिक पातळीवरच्या माणुसकी धर्माबद्दल अजिबात बोलत नाहीये. मी रोजच्या व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. समाजात, शेजारी-पाजारी, गल्लीत, गावात एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही कसे राहतो? कसे वागतो? याचा विचार तर करा! आई, वडील, गुरूजन, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा सन्मान करणे ही माणुसकी, सुसंस्कृतपणा. पण जे जमत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. गर्दीच्या ठिकाणी प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी वृद्ध नागरिक, महिला, अंध, अपंग, लहान मुले यांच्याशी थोडी तरी सौजन्याची वागणृक ठेवा. त्यांना ढकलू नका, धक्का मारून पुढे जावू नका, किमान एवढे तर सौजन्य ठेवा. गर्दीत आपले वाहन पुढे दामटणे, रेल्वेगेट उघडल्यावर अतीघाईने वाहन पुढे घुसवण्याचा प्रयत्न करणे, चालत्या वाहनातून, मोटारबाईकवरून गुटखा खावून पचकन थुंकणे आणि कुणी बोलले तर त्याला शिवीगाळ करणे, धमकावणे ही संस्कृती तरी नका बनवू. तरुण मुले आणि तरुण मुली आज बिनदिक्कतपणे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक बगीचे, रस्ते या ठिकाणी बिभत्स वर्तन करताना महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांचे भान ठेवणे तर सोडाच पण उलट त्यांना निर्लज्जपणे सामोरे जातात. निदान ते तरी करू नका. व्हीडीओ शुटींग आणि फोटोग्राफीमध्ये धन्यता मानली जाते. यामुळे आम्ही माणूस आहोत का? या गोष्टीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ आज तर काळ खूपच बदलला आहे आणि बहिणाबार्इंचा हा प्रश्न अधिकच टोकदार झाला आहे. आमचा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत.- विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव