शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

माणुसकीवरच प्रश्चचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील विलास भाऊलाल पाटील...

‘भर रस्त्यात, ज्यांचे नाव घेण्यात आम्ही स्वत:ला धन्य समजतो अशा छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर दोन मस्तवाल गावगुंड एका असाह्य तरुणीला बदडत असतील आणि सभोवतालचा नपुंसक समाज उघड्या डोळ्यांनी फक्त गंमत पाहतो.या जमावात सामान्य माणसापासून तथाकथित राजकीय पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांचाही समावेश असतो. ही अत्यंत दुर्दैवी, लाजीरवाणी आणि आम्ही माणूस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. ही एकच नव्हे अशा असंख्य घटना आमच्या सभोवताली रोज घडत असतात आणि मला माझ्या माणुसपणाची लाज वाटते नव्हे तर घृणा येते. अशा माणुसपणाला पशुची किंवा जनावरांची उपमा देणे हासुद्धा मला त्या मुक्या जिवांचा अपमान वाटतो. कारण आजचा तथाकथित माणूस जसा वागतो आहे तसा पशुसुद्धा कधी वागत नाही. जनावरालाही एक निसर्ग निर्मित चौकट आहे आणि अपवादात्मक परिस्थिती वगळता ही चौकट तो कधीच मोडत नाही. पण तथाकथित माणसाने सर्वच चौकटी मोडून कधीच भंगाराच्या भावात विकून टाकल्या आहेत.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे आम्ही, कोरडी पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याच्या मागे, तुपाची वाटी घेऊन धावणाºया आणि मरणासन्न गाढवाला गंगेचे पाणी पाजणाºया संत एकनाथ महाराजांचा जयघोष करत कथा कीर्तनात नाचणारे आम्ही, ‘खरा तो एकचि धर्म-जगाला प्रेम अर्पावे ! ही पूज्य सानेगुरूजींची प्रार्थना रोज शाळेत उच्चारून म्हणणारे आम्ही.‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे साळसुदपणे आळवणारे आम्ही. आमचा खरा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत. उपासना पद्धतीला धर्म ठरवून त्यासाठी रक्तपातासह सिद्ध असणारे आम्ही. ‘खºया माणुसकी धर्माला’ पार विसरुन गेलो आहोत. मी उच्च पातळीवरच्या किंवा अध्यात्मिक पातळीवरच्या माणुसकी धर्माबद्दल अजिबात बोलत नाहीये. मी रोजच्या व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. समाजात, शेजारी-पाजारी, गल्लीत, गावात एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही कसे राहतो? कसे वागतो? याचा विचार तर करा! आई, वडील, गुरूजन, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा सन्मान करणे ही माणुसकी, सुसंस्कृतपणा. पण जे जमत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. गर्दीच्या ठिकाणी प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी वृद्ध नागरिक, महिला, अंध, अपंग, लहान मुले यांच्याशी थोडी तरी सौजन्याची वागणृक ठेवा. त्यांना ढकलू नका, धक्का मारून पुढे जावू नका, किमान एवढे तर सौजन्य ठेवा. गर्दीत आपले वाहन पुढे दामटणे, रेल्वेगेट उघडल्यावर अतीघाईने वाहन पुढे घुसवण्याचा प्रयत्न करणे, चालत्या वाहनातून, मोटारबाईकवरून गुटखा खावून पचकन थुंकणे आणि कुणी बोलले तर त्याला शिवीगाळ करणे, धमकावणे ही संस्कृती तरी नका बनवू. तरुण मुले आणि तरुण मुली आज बिनदिक्कतपणे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक बगीचे, रस्ते या ठिकाणी बिभत्स वर्तन करताना महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांचे भान ठेवणे तर सोडाच पण उलट त्यांना निर्लज्जपणे सामोरे जातात. निदान ते तरी करू नका. व्हीडीओ शुटींग आणि फोटोग्राफीमध्ये धन्यता मानली जाते. यामुळे आम्ही माणूस आहोत का? या गोष्टीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ आज तर काळ खूपच बदलला आहे आणि बहिणाबार्इंचा हा प्रश्न अधिकच टोकदार झाला आहे. आमचा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत.- विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव