शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

माणुसकीवरच प्रश्चचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील विलास भाऊलाल पाटील...

‘भर रस्त्यात, ज्यांचे नाव घेण्यात आम्ही स्वत:ला धन्य समजतो अशा छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर दोन मस्तवाल गावगुंड एका असाह्य तरुणीला बदडत असतील आणि सभोवतालचा नपुंसक समाज उघड्या डोळ्यांनी फक्त गंमत पाहतो.या जमावात सामान्य माणसापासून तथाकथित राजकीय पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांचाही समावेश असतो. ही अत्यंत दुर्दैवी, लाजीरवाणी आणि आम्ही माणूस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. ही एकच नव्हे अशा असंख्य घटना आमच्या सभोवताली रोज घडत असतात आणि मला माझ्या माणुसपणाची लाज वाटते नव्हे तर घृणा येते. अशा माणुसपणाला पशुची किंवा जनावरांची उपमा देणे हासुद्धा मला त्या मुक्या जिवांचा अपमान वाटतो. कारण आजचा तथाकथित माणूस जसा वागतो आहे तसा पशुसुद्धा कधी वागत नाही. जनावरालाही एक निसर्ग निर्मित चौकट आहे आणि अपवादात्मक परिस्थिती वगळता ही चौकट तो कधीच मोडत नाही. पण तथाकथित माणसाने सर्वच चौकटी मोडून कधीच भंगाराच्या भावात विकून टाकल्या आहेत.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे आम्ही, कोरडी पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याच्या मागे, तुपाची वाटी घेऊन धावणाºया आणि मरणासन्न गाढवाला गंगेचे पाणी पाजणाºया संत एकनाथ महाराजांचा जयघोष करत कथा कीर्तनात नाचणारे आम्ही, ‘खरा तो एकचि धर्म-जगाला प्रेम अर्पावे ! ही पूज्य सानेगुरूजींची प्रार्थना रोज शाळेत उच्चारून म्हणणारे आम्ही.‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे साळसुदपणे आळवणारे आम्ही. आमचा खरा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत. उपासना पद्धतीला धर्म ठरवून त्यासाठी रक्तपातासह सिद्ध असणारे आम्ही. ‘खºया माणुसकी धर्माला’ पार विसरुन गेलो आहोत. मी उच्च पातळीवरच्या किंवा अध्यात्मिक पातळीवरच्या माणुसकी धर्माबद्दल अजिबात बोलत नाहीये. मी रोजच्या व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. समाजात, शेजारी-पाजारी, गल्लीत, गावात एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही कसे राहतो? कसे वागतो? याचा विचार तर करा! आई, वडील, गुरूजन, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा सन्मान करणे ही माणुसकी, सुसंस्कृतपणा. पण जे जमत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. गर्दीच्या ठिकाणी प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी वृद्ध नागरिक, महिला, अंध, अपंग, लहान मुले यांच्याशी थोडी तरी सौजन्याची वागणृक ठेवा. त्यांना ढकलू नका, धक्का मारून पुढे जावू नका, किमान एवढे तर सौजन्य ठेवा. गर्दीत आपले वाहन पुढे दामटणे, रेल्वेगेट उघडल्यावर अतीघाईने वाहन पुढे घुसवण्याचा प्रयत्न करणे, चालत्या वाहनातून, मोटारबाईकवरून गुटखा खावून पचकन थुंकणे आणि कुणी बोलले तर त्याला शिवीगाळ करणे, धमकावणे ही संस्कृती तरी नका बनवू. तरुण मुले आणि तरुण मुली आज बिनदिक्कतपणे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक बगीचे, रस्ते या ठिकाणी बिभत्स वर्तन करताना महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांचे भान ठेवणे तर सोडाच पण उलट त्यांना निर्लज्जपणे सामोरे जातात. निदान ते तरी करू नका. व्हीडीओ शुटींग आणि फोटोग्राफीमध्ये धन्यता मानली जाते. यामुळे आम्ही माणूस आहोत का? या गोष्टीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ आज तर काळ खूपच बदलला आहे आणि बहिणाबार्इंचा हा प्रश्न अधिकच टोकदार झाला आहे. आमचा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत.- विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव