शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पूर्णा नदीला पूर; जळगाव जामोद, संग्रामपूरचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 20:36 IST

Jalgaon : जळगाव जामोद येथून बुलढाणा, अकोला आणि शेगाव जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले. या दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटला आहे. 

जळगाव जामोद : रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला मोठा पूर आला असून त्यामुळे जळगाव जामोद-नांदुरा वाहतूक सोमवारी दुपारी पाच वाजतापासून बंद झाली. तर जळगाव जामोद-संग्रामपूर- शेगाव मार्ग कालखेड जवळ असलेल्या नाल्याला पूर असल्यामुळे सकाळपासूनच बंद आहे. जळगाव जामोद येथून बुलढाणा, अकोला आणि शेगाव जाण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले. या दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटला आहे. 

जळगाव नांदुरा मार्गावरील मानेगाव येथे पूर्णा नदीच्या पुलावर बांधलेला पूल गेल्या चार वर्षापासून शोभेची वस्तू बनला आहे. दरवर्षी प्रवाशांना वाटते या पावसाळ्यात तरी हा पूल चालू होईल. परंतु अद्यापही हा पूल सुरू होण्याचा झालेला नाही. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला म्हणजे इंग्रजकालीन पूल पुराखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. हिच परिस्थिती सोमवारी निर्माण झाली आहे. प्रवाशांना अकोला किंवा बुलढाणा जायचे असल्यास मुक्ताईनगर मलकापूर मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागतो. पूर्णा नदीला पुलावरून पाणी असताना कोणीही वाहनधारक त्यावरून जाऊ नये, यासाठी पुलावर जळगाव जामोद पोलिसांच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रूग्ण महिलेला बैलगाडीचा आधार, टाकळीपंच संपर्क तुटला! पातुर्डा : जवळच्या टाकळीपंच येथील मोरवा नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने या पूर्णाकाठच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे. रात्री उशीरापर्यत पाणी उतरले नव्हते. सोमवारी पातुर्डा येथे आठवडी बाजार असतो. नागरिकांना बाजारात येता आले नाही. या दरम्यान रूग्णांना त्रास झाला. गावातील शीला झाडोकार यांना अचानक दुखण्याचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना बैलगाडीतून शेत रस्त्याने कोद्री मार्गे पातुर्डा येथे दवाखान्यात न्यावे लागले. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे दिसून आले. पूर्णा नदीला पुर वाढण्याची परिस्थीती असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊसriverनदी