शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
2
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
3
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
4
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
5
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
6
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
7
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
8
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
9
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
10
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
11
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
12
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
13
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
14
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
15
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
16
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
17
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
18
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
19
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
20
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST

पाचोरा / चाळीसगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दादा भुसे ...

पाचोरा / चाळीसगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी पाचोरा येथे केली. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी रोहिणी, ता. चाळीसगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले.

मंत्री भुसे यांनी चाळीसगाव पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शनिवारी पाहणी केली. यानंतर पाचोरा येथे शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते. मंत्री म्हणाले की, झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आठवडाभरात हे कामकाज पूर्ण होऊन किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, हे समोर आल्यानंतर राज्यव्यापी नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात येईल.

केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेत बदल व्हावेत म्हणून राज्य सरकारने बीड मॉडेल सादर केले होते. परंतु, केंद्र सरकारने त्याला परवानगी दिली नाही. आता तर तेच मॉडेल मध्य प्रदेश सरकारने स्वीकारले. शेतकऱ्याने पीक विमा कंपनीच्या नावे दिलेल्या पत्राची प्रत कृषी विभागात सादर केल्यास ते पत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, रोहिणी येथे भाजपच्या वतीने रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भुसे यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले. मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुंबल्यामुळे ७ ते ८ गावांचा चाळीसगाव तालुक्याशी संपर्क तुटल्याची तक्रार आंदोलकांनी केली. त्यावर रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

110921\img_20210911_142627.jpg

पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे आमदार किशोर पाटील आणि आणि मान्यवर