शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST

पाचोरा / चाळीसगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दादा भुसे ...

पाचोरा / चाळीसगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी पाचोरा येथे केली. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, या मागणीसाठी रोहिणी, ता. चाळीसगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले.

मंत्री भुसे यांनी चाळीसगाव पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शनिवारी पाहणी केली. यानंतर पाचोरा येथे शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते. मंत्री म्हणाले की, झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आठवडाभरात हे कामकाज पूर्ण होऊन किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, हे समोर आल्यानंतर राज्यव्यापी नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात येईल.

केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेत बदल व्हावेत म्हणून राज्य सरकारने बीड मॉडेल सादर केले होते. परंतु, केंद्र सरकारने त्याला परवानगी दिली नाही. आता तर तेच मॉडेल मध्य प्रदेश सरकारने स्वीकारले. शेतकऱ्याने पीक विमा कंपनीच्या नावे दिलेल्या पत्राची प्रत कृषी विभागात सादर केल्यास ते पत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, रोहिणी येथे भाजपच्या वतीने रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. भुसे यांचे वाहन अडवून त्यांना निवेदन दिले. मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुंबल्यामुळे ७ ते ८ गावांचा चाळीसगाव तालुक्याशी संपर्क तुटल्याची तक्रार आंदोलकांनी केली. त्यावर रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

110921\img_20210911_142627.jpg

पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे आमदार किशोर पाटील आणि आणि मान्यवर