शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ११ सावकारांविरुद्ध कारवाईसाठी चालढकल! पाच महिने उलटूनही फौजदारी कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:36 IST

...त्यामुळे ही ‘बोट दाखवा’ मोहिम सावकारांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कुंदन पाटील - जळगाव : रावेर, यावल तालुक्यातील ११ सावकारांनी बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळाल्या. जिल्हा उपनिबंधकांच्या या कारवाईनंतर प्रशासनाचा गौरवही झाला. मात्र या सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी उपनिबंधकांनी तक्रार द्यावी, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होणार असून त्याठी पोलीस अधीक्षकांना पत्र देणार असल्याची भूमिका उपनिबंधकांनी घेतली आहे. त्यामुळे ही ‘बोट दाखवा’ मोहिम सावकारांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नंदकुमार मुकूंदा पाटील, मधुकर तुकाराम राणे, सुदाम तुकाराम राणे, मुरलीधर सुदाम राणे, मालती मधुकर राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशिनाथ राणे, मधुकर वामन चौधरी, श्रीधर गोपाळ पाटील, देवानंद नामदेव बढे व सुधाकर मुकूंदा पाटील असे या सावकारांचे नाव आहे. या सावकारांनी रावेर, यावल तालुक्यातील १६ शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या होत्या. त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती.त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पुरावे, दस्ताऐवजांकरवी सुनावणी केली. त्यानुसार दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी या सर्वच प्रकरणांचा निवाडा केला. त्यानुसार सावकारांनी बळकावलेल्या शेतजमीनी परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना जमीनी परतही मिळाल्या. मात्र या सावकारांविरोधात  मात्र कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे सहकार विभागाच्या भूमिकेविषयी अनेकांनी आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

पोलीस म्हणतात.... -दरम्यान, नीलेश धनसिंग पाटील (दुसखेडा ता.रावेर) या शेतकऱ्याने सावदा पोलिसात सावकारांविरोधात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांना लेखी स्वरुपात समजपत्र दिले. या समजपत्रातील तपशीलनुसार महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये जिल्हा उपनिबंधक यांनी तक्रार दाखल करणे उचीत आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. त्यानंतर संबंधिताने जिल्हा उपनिबंधकांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला. मात्र पाच महिने उलटल्यावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

कायद्यानुसार जमीनी परत करण्याचे अधिकार आहेत. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले जाणार आहे.-संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस