शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘त्या’ ११ सावकारांविरुद्ध कारवाईसाठी चालढकल! पाच महिने उलटूनही फौजदारी कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:36 IST

...त्यामुळे ही ‘बोट दाखवा’ मोहिम सावकारांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कुंदन पाटील - जळगाव : रावेर, यावल तालुक्यातील ११ सावकारांनी बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळाल्या. जिल्हा उपनिबंधकांच्या या कारवाईनंतर प्रशासनाचा गौरवही झाला. मात्र या सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी उपनिबंधकांनी तक्रार द्यावी, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होणार असून त्याठी पोलीस अधीक्षकांना पत्र देणार असल्याची भूमिका उपनिबंधकांनी घेतली आहे. त्यामुळे ही ‘बोट दाखवा’ मोहिम सावकारांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नंदकुमार मुकूंदा पाटील, मधुकर तुकाराम राणे, सुदाम तुकाराम राणे, मुरलीधर सुदाम राणे, मालती मधुकर राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मुरलीधर काशिनाथ राणे, मधुकर वामन चौधरी, श्रीधर गोपाळ पाटील, देवानंद नामदेव बढे व सुधाकर मुकूंदा पाटील असे या सावकारांचे नाव आहे. या सावकारांनी रावेर, यावल तालुक्यातील १६ शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या होत्या. त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती.त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पुरावे, दस्ताऐवजांकरवी सुनावणी केली. त्यानुसार दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी या सर्वच प्रकरणांचा निवाडा केला. त्यानुसार सावकारांनी बळकावलेल्या शेतजमीनी परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना जमीनी परतही मिळाल्या. मात्र या सावकारांविरोधात  मात्र कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे सहकार विभागाच्या भूमिकेविषयी अनेकांनी आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

पोलीस म्हणतात.... -दरम्यान, नीलेश धनसिंग पाटील (दुसखेडा ता.रावेर) या शेतकऱ्याने सावदा पोलिसात सावकारांविरोधात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांना लेखी स्वरुपात समजपत्र दिले. या समजपत्रातील तपशीलनुसार महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये जिल्हा उपनिबंधक यांनी तक्रार दाखल करणे उचीत आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. त्यानंतर संबंधिताने जिल्हा उपनिबंधकांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला. मात्र पाच महिने उलटल्यावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

कायद्यानुसार जमीनी परत करण्याचे अधिकार आहेत. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले जाणार आहे.-संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस