शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

राज्यातील प्राथमिक शिक्षकांना अधिवेशन विशेष रजा नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:20 AM

उन्हाळी सुटीमध्ये अधिवेशन घेण्याची ग्रामविकास विभागाने शिक्षक समितीला केली सूचना

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचा सुटींवर अंकूश लावण्याचा प्रयत्नशिक्षकांचे अधिवेशन उन्हाळी सुटीमध्येच घेण्याच्या सूचनाविशेष रजा मिळणार नसल्याने गुरुजींमध्ये नाराजी

आॅनलाईन लोकमतगोंडगाव, ता भडगाव,दि.६ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीच्या वतीने शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन किंवा शिक्षण परिषद घेण्यासाठी शिक्षकांना विशेष रजा मंजूर करण्याबाबतचे पत्र ग्रामविकास विभागाला दिले होते. मात्र ग्रामविकास विभागाने विशेष रजा नाकारून उन्हाळी सुटीमध्ये हे अधिवेशन घेण्याच्या सूचना शिक्षक समितीला दिल्या असल्याचे समजते. त्यामुळे शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षकांना विशेष रजेच्या निमित्याने मिळणारी सुटी दुरापास्त झाली आहे.राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. दिवाळीनंतर दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर या संघटनांना वेध लागतात, ते शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे. या अधिवेशनाच्या निमित्याने सात दिवसांच्या विशेष रजा शासनाकडून मंजूर करून घेतल्या जात होत्या. यापूर्वी शासन तशा रजा शिक्षक संघटनांना देत असे. मात्र आता ग्रामविकास विभागाने त्यावर अंकूश लावण्याचा प्रयत्न केला आहे. दुसºया शैक्षणिक सत्रामध्ये अधिवेशन किंवा शिक्षण परिषद घेतल्यास आठ दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शैक्षणिक सत्राच्या कालावधीत अधिवेशन घेता येणार नाही, असे ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षक समितीच्या राजाध्यक्षांना दिलेल्या पत्राद्वारे सांगितले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करायची असेल, दिशा ठरवायची असेल तर शिक्षकांचे अधिवेशन प्रदीर्घ असलेल्या उन्हाळी सुटीमध्येच घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्याध्यक्षांना २३ नोव्हेंबर रोजी दिले आहे. शिक्षण विभाग व ग्रामविकासाच्या मदतीने उन्हाळी सुटीमध्ये हे अधिवेशन घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीअधिवेशनाच्या निमित्ताने विशेष रजा घेऊन वैयक्तिक कामे करण्याºया गुरुजींना ग्रामविकासाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. विशेष रजा मिळणार नसल्याने गुरुजींमध्ये नाराजी पसरली आहे. मुलांचा गुणवत्तेचा विचार करता शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 अधिवेशन काळात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावाद तसेच शैक्षणिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी अधिवेशन होत असते. ग्रामविकास विभागाने स्पष्टपणे नकार द्यायला नको होता. शिक्षकाने जी रजा भोगली त्याचा अभ्यासक्रम तो पूर्ण करतोच. त्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील असून, पुन्हा ग्रामविकास विभागाला पत्र पाठविणार आहे.-विलास यादवराव नेरकरजिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, जळगाव

टॅग्स :Teacherशिक्षकJalgaonजळगावGovernmentसरकार