शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

राज्यातील ३१२ ग्रामपंचायतीसाठी आता २७ रोजी मतदान, सुधारीत कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:05 PM

अर्ज सादर करण्याची वेळही वाढवली

ठळक मुद्दे निकालही २६ ऐवजी २८ रोजी १४ रोजी छाननी

जिजाबराव वाघ / आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या राज्यातील ३१२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून सर्व कार्यक्रम दोन दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. ग्रा.पं.साठी पूर्वी जाहीर केलेल्या २५ ऐवजी २७ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निकालही २६ ऐवजी २८ रोजी जाहीर केले जातील. ९ रोजी राज्य निवडणूक आयोग सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक होणाºया ५८ तर पोटनिवडणूक होणा-या १३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.राज्यातील नाशिक विभाग ७५, कोकण ३९, पुणे १३१, औरंगाबाद ३५, अमरावती १०, नागपूर २२ अशा ३१२ ग्रामपंचायतीची मुदत मार्च ते मे २०१८ पर्यंत आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी २५ रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र निवडणुक आयोगाने नऊ रोजी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता मतदान २७ रोजी घेण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचादेखील यात समावेश आहे.सुधारीत निवडणुक कार्यक्रम३१२ ग्रा.पं.च्या ४१०१ तर पोट निवडणुकीच्या ६८७१ जागांसाठीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा पर्यंत करण्यात आली आहे. १२ पर्यंत अर्ज दाखल करावयाचे असून १४ रोजी छाननी होईल. १६ रोजी माघार होऊन दुपारी तीन वाजेनंतर निवडणुक चिन्ह वाटप होईल. २७ रोजी मतदान तर २८ रोजी निकाल जाहीर होतील.निवडणुक कार्यक्रमात अंशत: बदल केले आहेत. नऊ रोजी राज्य निवडणुक आयोगाचे पत्र मिळाले असून उमेदवारांनी सुधारीत कार्यक्रम माहित करुन घ्यावा. यासाठी निवडणुक शाखेमार्फत प्रबोधन करण्यात येत आहे.- कैलास देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक