शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नाशिवंत देह जाणार सकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST

तरावया पार भवसिंधु॥ या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत ...

तरावया पार भवसिंधु॥

या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत असताना, या भवसागरातून तरून जायचे असेल, म्हणजेच संसाररूपी दुःखाच्या गर्तेत सुखरूपी आनंद मिळवायचा असेल, तर प्रत्येक क्षणाला आपली सद्सद्विवेक

बुद्धी जागृत ठेवून विचार करायला हवा. ‘कारण’ दु:ख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे अथवा संसार दुःखामुळे चहुकडे... विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, जो देखें वों दुःखिया बाबा सुखिया कोई नही रें, या जगात कुणीच सुखी नाही.

म्हणून एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा माणुसकी धर्माप्रमाणे आचरण करावे.

ज्ञानेश्वरीमधील माउलींच्या ओवीप्रमाणे-

‘जे-जे उपजें ते-ते नांशे, नाशिले पुनरूपी दिसें, हे घटिका यंत्र जैसें परिभ्रमें गां’

प्रत्येक मानवाचा देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंच महाभूतांपासून बनलेला आहे. तो एक दिवस त्यांच्या मध्येच विलिन होणार आहे व देह हे काळाचे... धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे, म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करूनि मरावे. या संतांच्या अभंगाप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा देताना, संत मानवाला योग्य चिंतन करण्याचा सल्ला देतात. चिंतनाचे एकूण चार प्रकार आहेत.

विषय चिंतन : यात शब्द, स्पर्श, रूप रस, गंध या पंचविषयांत मनुष्य गुंतून पडतो. व्यर्थ चिंतन : कसे होते? कसे झाले? काय होईल? हे चिंतन काय कामाचे. परदोष चिंतन : यांत दुसऱ्यांच्या दोषांचेच चिंतन केले जाते. मात्र, स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष केले जाते. येथेच मानवाची फसगत होते. भग्वद्चिंतन : म्हणजेच नामचिंतन होय. परमात्माचे चिंतन होय व हेच चिंतन महत्त्वाचे आहे. यामुळेच मानवाची प्रवृत्ती नामी बनते व ‘कोहं कोहं’ म्हणजे मी कोण आहे? असा प्रश्न निर्माण होऊन अहं ब्रह्मास्मीची प्रचिती येते. या इहलोकांच्या म्हणजेच संसारातील सर्व संबंधितांच्या मतलबी व्यवहारामध्ये स्वतः डोळ्यामधे अज्ञानरूपी धूर भरून राहू नये. कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतः या काळीचे नाही कोणी. म्हणून संसाराच्या मोह पाशात गुंतून न राहता, स्वतःसह समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावा, असा इशाराच संत देतात.

बाळकृष्ण महाराज चव्हाण, वरणगांव.