शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नाशिवंत देह जाणार सकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST

तरावया पार भवसिंधु॥ या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत ...

तरावया पार भवसिंधु॥

या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत असताना, या भवसागरातून तरून जायचे असेल, म्हणजेच संसाररूपी दुःखाच्या गर्तेत सुखरूपी आनंद मिळवायचा असेल, तर प्रत्येक क्षणाला आपली सद्सद्विवेक

बुद्धी जागृत ठेवून विचार करायला हवा. ‘कारण’ दु:ख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे अथवा संसार दुःखामुळे चहुकडे... विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, जो देखें वों दुःखिया बाबा सुखिया कोई नही रें, या जगात कुणीच सुखी नाही.

म्हणून एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा माणुसकी धर्माप्रमाणे आचरण करावे.

ज्ञानेश्वरीमधील माउलींच्या ओवीप्रमाणे-

‘जे-जे उपजें ते-ते नांशे, नाशिले पुनरूपी दिसें, हे घटिका यंत्र जैसें परिभ्रमें गां’

प्रत्येक मानवाचा देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंच महाभूतांपासून बनलेला आहे. तो एक दिवस त्यांच्या मध्येच विलिन होणार आहे व देह हे काळाचे... धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे, म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करूनि मरावे. या संतांच्या अभंगाप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा देताना, संत मानवाला योग्य चिंतन करण्याचा सल्ला देतात. चिंतनाचे एकूण चार प्रकार आहेत.

विषय चिंतन : यात शब्द, स्पर्श, रूप रस, गंध या पंचविषयांत मनुष्य गुंतून पडतो. व्यर्थ चिंतन : कसे होते? कसे झाले? काय होईल? हे चिंतन काय कामाचे. परदोष चिंतन : यांत दुसऱ्यांच्या दोषांचेच चिंतन केले जाते. मात्र, स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष केले जाते. येथेच मानवाची फसगत होते. भग्वद्चिंतन : म्हणजेच नामचिंतन होय. परमात्माचे चिंतन होय व हेच चिंतन महत्त्वाचे आहे. यामुळेच मानवाची प्रवृत्ती नामी बनते व ‘कोहं कोहं’ म्हणजे मी कोण आहे? असा प्रश्न निर्माण होऊन अहं ब्रह्मास्मीची प्रचिती येते. या इहलोकांच्या म्हणजेच संसारातील सर्व संबंधितांच्या मतलबी व्यवहारामध्ये स्वतः डोळ्यामधे अज्ञानरूपी धूर भरून राहू नये. कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतः या काळीचे नाही कोणी. म्हणून संसाराच्या मोह पाशात गुंतून न राहता, स्वतःसह समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावा, असा इशाराच संत देतात.

बाळकृष्ण महाराज चव्हाण, वरणगांव.