शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिवंत देह जाणार सकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST

तरावया पार भवसिंधु॥ या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत ...

तरावया पार भवसिंधु॥

या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज मानवजातीला योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी बोध करतात. मानवाने जीवन जगत असताना, या भवसागरातून तरून जायचे असेल, म्हणजेच संसाररूपी दुःखाच्या गर्तेत सुखरूपी आनंद मिळवायचा असेल, तर प्रत्येक क्षणाला आपली सद्सद्विवेक

बुद्धी जागृत ठेवून विचार करायला हवा. ‘कारण’ दु:ख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे अथवा संसार दुःखामुळे चहुकडे... विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, जो देखें वों दुःखिया बाबा सुखिया कोई नही रें, या जगात कुणीच सुखी नाही.

म्हणून एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा माणुसकी धर्माप्रमाणे आचरण करावे.

ज्ञानेश्वरीमधील माउलींच्या ओवीप्रमाणे-

‘जे-जे उपजें ते-ते नांशे, नाशिले पुनरूपी दिसें, हे घटिका यंत्र जैसें परिभ्रमें गां’

प्रत्येक मानवाचा देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंच महाभूतांपासून बनलेला आहे. तो एक दिवस त्यांच्या मध्येच विलिन होणार आहे व देह हे काळाचे... धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे, म्हणून मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करूनि मरावे. या संतांच्या अभंगाप्रमाणे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा देताना, संत मानवाला योग्य चिंतन करण्याचा सल्ला देतात. चिंतनाचे एकूण चार प्रकार आहेत.

विषय चिंतन : यात शब्द, स्पर्श, रूप रस, गंध या पंचविषयांत मनुष्य गुंतून पडतो. व्यर्थ चिंतन : कसे होते? कसे झाले? काय होईल? हे चिंतन काय कामाचे. परदोष चिंतन : यांत दुसऱ्यांच्या दोषांचेच चिंतन केले जाते. मात्र, स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष केले जाते. येथेच मानवाची फसगत होते. भग्वद्चिंतन : म्हणजेच नामचिंतन होय. परमात्माचे चिंतन होय व हेच चिंतन महत्त्वाचे आहे. यामुळेच मानवाची प्रवृत्ती नामी बनते व ‘कोहं कोहं’ म्हणजे मी कोण आहे? असा प्रश्न निर्माण होऊन अहं ब्रह्मास्मीची प्रचिती येते. या इहलोकांच्या म्हणजेच संसारातील सर्व संबंधितांच्या मतलबी व्यवहारामध्ये स्वतः डोळ्यामधे अज्ञानरूपी धूर भरून राहू नये. कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतः या काळीचे नाही कोणी. म्हणून संसाराच्या मोह पाशात गुंतून न राहता, स्वतःसह समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावा, असा इशाराच संत देतात.

बाळकृष्ण महाराज चव्हाण, वरणगांव.