शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पातोंडा,मठगव्हाण,रुंधाटी शेत शिवार पाण्याने तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले ...

शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.

पातोंडा भागातील शेतजमीन पावसामुळे पूर्ण पाण्याने भरून जाते. गेल्या वर्षी आमदारांनी या भागातील शेतजमिनींचा सर्व्हे करण्यासाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. पातोंडा व सावखेड्याच्या नाल्यांमध्ये हे पाणी कसे वळवता येईल तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पाटचाऱ्यांचे सिंचन विभागाच्या माध्यमातून खोलीकरण करता येईल व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींच्या माध्यमातून शेतातील पाणी बाहेर कशा प्रकारे काढता येईल याबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासनाच्या नियमानुसार ६५ मि.मी. पेक्षा पाऊस जास्त असला तर, शेतातील पिकांचे पंचनामे करता येतात मात्र या भागात पर्जन्यमान कमी असले तरी पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहाते व पिकांचे नुकसान होते. यामुळे या भागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या शेतजमिनींचा पंचनामा करण्यात यावा, तसा प्रस्ताव व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

पाणी निचरा होण्यासाठी नियोजन

भविष्यात या भागातील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा कसा होईल व या भागातील लोकांना न्याय कसा मिळेल याचा विचार करून संबंधित विभागातील यंत्रणेशी संपर्क झालेला आहे. लवकरात लवकर या भागाचे सर्वेक्षण होऊन व संबंधित विभागांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल असे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.