शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

पातोंडा,मठगव्हाण,रुंधाटी शेत शिवार पाण्याने तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले ...

शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके धोक्यात आलेली आहेत. उभ्या असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.

पातोंडा भागातील शेतजमीन पावसामुळे पूर्ण पाण्याने भरून जाते. गेल्या वर्षी आमदारांनी या भागातील शेतजमिनींचा सर्व्हे करण्यासाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. पातोंडा व सावखेड्याच्या नाल्यांमध्ये हे पाणी कसे वळवता येईल तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पाटचाऱ्यांचे सिंचन विभागाच्या माध्यमातून खोलीकरण करता येईल व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींच्या माध्यमातून शेतातील पाणी बाहेर कशा प्रकारे काढता येईल याबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासनाच्या नियमानुसार ६५ मि.मी. पेक्षा पाऊस जास्त असला तर, शेतातील पिकांचे पंचनामे करता येतात मात्र या भागात पर्जन्यमान कमी असले तरी पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहाते व पिकांचे नुकसान होते. यामुळे या भागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या शेतजमिनींचा पंचनामा करण्यात यावा, तसा प्रस्ताव व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

पाणी निचरा होण्यासाठी नियोजन

भविष्यात या भागातील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा कसा होईल व या भागातील लोकांना न्याय कसा मिळेल याचा विचार करून संबंधित विभागातील यंत्रणेशी संपर्क झालेला आहे. लवकरात लवकर या भागाचे सर्वेक्षण होऊन व संबंधित विभागांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल असे आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.