मुंबईतील पावसामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर अडकले प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:18 IST2019-07-02T12:18:11+5:302019-07-02T12:18:50+5:30
काही गाड्या रद्द

मुंबईतील पावसामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर अडकले प्रवासी
जळगाव : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्यांवर मोठा परिणाम झाला असून मध्यरात्री तीन वाजेपासून सेवाग्राम एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर रखडली आहे. यामुळे प्रवासी स्थानकावरच अडकले असून या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान पावसामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून अप मार्गावरील गाड्या नाशिक पर्यंतच धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.