शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नाराजीचा ‘पाऊस’ पडताच मंत्रालयातून निघाले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 08:14 IST

‘मिशन अमृत सरोवर’साठी तयार होणार मसुदा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव /मुंबई: केंद्र शासनाने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी ‘मिशन अमृत सरोवर’ प्रकल्प राबविण्यात राज्य शासनाकडून होणाऱ्या दिरंगाईसंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली आणि राज्य शासनासह मृद व जलसंधारण विभागावर नाराजीचा पाऊस सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने तातडीने हालचाली करत मसुदा निश्चित करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश तातडीने काढले आहेत.

विशेष म्हणजे, राज्य शासनाने गाळ वाहून नेण्यासाठी इंधनासोबतच यंत्रसामग्रीचाही खर्च देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून  ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राज्यात प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

४४ कोटी घनमीटर गाळराज्यातील जलप्रकल्पांमध्ये सुमारे ४४ कोटी घनमीटर गाळ आहे. त्यामुळे ‘बीजेएस’ आणि ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशन यांच्या सहभागातून राज्यात ही योजना राबविण्याचे शासनाने प्रस्तावित केले आहे. गतकाळात केवळ इंधन खर्च देण्यात येत होता. यांत्रिक खर्च स्वयंसेवी संस्था व वाहतूक खर्च शेतकरी करीत होते. आता दोन्ही खर्च राज्य शासन देणार आहे. 

अल्पभूधारकांनाही हातभारअत्यल्प व  अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी राज्य शासनाकडून खर्च देण्यात येणार आहे; तसेच विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरीही अनुदानास पात्र राहणार आहेत. एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत अडीच एकरांपर्यंतच्या क्षेत्रासाठी ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येईल.

जलप्रेमींची नाराजीकेंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ‘मिशन अमृत योजना’ राबविण्यासाठी भारतीय जैन समाजासोबत (बीजेएस) सामंजस्य करार केला होता. त्यानुसार राज्य सरकारनेही ‘बीजेएस’सोबत करार  करणे अपेक्षित होते; मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही राज्य शासनाने या करारावर सह्या केल्या नव्हत्या. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर जलप्रेमींमध्ये शासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. 

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस