शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

फक्त चार आगारातील बसेस कोरोना फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ११ आगारांपैकी फक्त चार आगारांमध्येच ५० टक्केपेक्षा जास्त अँटी मायक्रोबियल कोटिंगचे काम पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील ११ आगारांपैकी फक्त चार आगारांमध्येच ५० टक्केपेक्षा जास्त अँटी मायक्रोबियल कोटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यात जळगाव, अमळनेर, एरंडोल आणि जामनेर येथे काम झाले आहे. तर पाचोरा येथे शुक्रवारी कामाला सुरुवात करण्यात आली होती. इतर सर्व आगारातील एकही बसला कोरोना फ्री करण्यात आलेले नाही. असे असले तरी प्रवासी मात्र बेफिकिरीनेच प्रवास करताना दिसून येत आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक बसेस या जळगाव आगारात आहेत. त्यात ११८ पैकी ७६ बसेसचे अँटी मायक्रोबियल कोटिंग करण्यात आले आहे. तर भुसावळ आणि चाळीसगाव या दोन मोठ्या आगारांचे देखील कोटिंग अद्याप करण्यात आलेले नाहीत.

किती बसेसना कोटिंग ?

जळगाव ११८ ७६

अमळनेर ७१ ४२

एरंडोल ५४ २२

जामनेर ७८ २१

पाचोरा ५६ काम सुरू

चाळीसगाव ७६ ०

यावल ६० ०

चोपडा ७६ ०

मुक्ताईनगर ४७ ०

रावेर ५६ ०

भुसावळ ४५ ०

एका एसटीला वर्षातून चार वेळा होणार कोटिंग

एका एसटीला कोटिंग केल्यावर त्याचा परिणाम हा साधारणत: दोन ते तीन महिने राहतो. या कोटिंगवर कोणताही विषाणू तग धरू शकत नाही. त्यामुळे बाधित व्यक्ती सिटवर बसली तरी ती उठून गेल्यावर तेथे विषाणू राहू शकणार नाही.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूला बसला असल्यास?

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही. मात्र बाजूला बसलेला असल्यास त्यातून संसर्गाची शक्यता बळावते. त्यामुळे प्रवाशांनी मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. जळगाव आगारातून सुटणाऱ्या अनेक बसेसमध्ये प्रवासी मास्क न लावताच बसलेले होते.

प्रवासी काय म्हणतात...

कोटिंग केल्याचा परिणाम नेमका काय होणार, जर बाधित व्यक्ती बाजूला बसली असेल तर त्यातून संसर्ग होऊ शकतो. मात्र आता कुणीच त्याचा जास्त विचार करत नाही. आम्हाला प्रवास करायला मिळतो, हेच खूप आहे. - दामोदर पाटील

अशी कोटिंग केल्याने जर कोरोना जाणार असेल तर सर्व बसेसला कोटिंग करावी. त्यामुळे प्रवास आणखी सुरक्षित होईल. ५० टक्के बसेसलाच का, सर्व बसेसला कोटिंग करायला हवे. त्यामुळे प्रवाशांना फायदाच होईल - रामचंद्र भोई.