शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी एक कोटींची निविदा, तीनच महिन्यात काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:16 AM

प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा डमी १ हजार रुपये एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च एका ...

प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा

डमी

१ हजार रुपये

एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च

एका कंपनीला देण्यात आला मक्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न अधिकच बिकट होत असून, गेल्या ११ महिन्यात शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात २७५ जण जखमी झाले आहेत तर एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मनपाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेला दीड कोटींचा मक्ता दिला होता. मात्र, केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर समितीने प्राणीमित्रांच्या तक्रारीनंतर तीनच महिन्यात हे काम थांबवले आहे. या तीन महिन्यात मनपाकडून केवळ २०० भटक्या श्वानांवर ही शस्त्रक्रिया होऊ शकली.

मनपाने श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम थांबवून आता ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला असून, शहरातील भटक्या श्वानांची संख्या १९ हजारांच्या घरात गेली आहे. शहरात वाढत जाणाऱ्या या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्याचा घटना पाहता, नागरिकांमध्ये कमालीची भीती पाहायला मिळत आहे. शहरातील वाढीव भागात याचा सर्वाधिक धोका असून, याबाबत मनपाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर या संस्थेनेच हे काम थांबविल्याने मनपाकडून शहरातील या भीषण समस्येबाबत आतापर्यंत कोणताही ठोस पाठपुरावा झालेला नाही.

हजारो श्वानांसाठी व्यवस्थाच नाही

शहरातील श्वानांची संख्या आता १९ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, मनपाकडून कोणतेही नियोजन नसल्याने ही संख्या याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच मनपाकडून आधी डॉग व्हॅनद्वारे श्वान पकडल्यानंतर त्यांना शहराबाहेर सोडण्यात येत होते. मात्र, हे कामदेखील आता बंद आहे.

वाघ नगर, शिवाजी नगर भागात दहशत

शहरातील वाढीव भागासह शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांलगत भटक्या श्वानांची सर्वाधिक भीती आहे. यामध्ये वाघ नगर भागात गेल्या पंधरा दिवसात भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या १५पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. यासह निमखेडी, शिरसोली रस्ता, शिवाजी नगरसह कांचन नगर, आसोदा रोड, कानळदा रोड या परिसरातही श्वानांची सर्वाधिक भीती आहे.

दररोज ५ घटना

शहरातील भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरात सरासरी अशा ५ घटना होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोट..

शहरातील समस्यांबाबत ॲनिमल वेलफेअर संस्थेशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून, शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येबाबतची माहिती दिली आहे. केंद्राकडून सूचना आल्यानंतर याविषयी तत्काळ नियोजन करण्यात येईल.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा