शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी एक कोटींची निविदा, तीनच महिन्यात काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा डमी १ हजार रुपये एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च एका ...

प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा

डमी

१ हजार रुपये

एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च

एका कंपनीला देण्यात आला मक्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न अधिकच बिकट होत असून, गेल्या ११ महिन्यात शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात २७५ जण जखमी झाले आहेत तर एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मनपाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेला दीड कोटींचा मक्ता दिला होता. मात्र, केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर समितीने प्राणीमित्रांच्या तक्रारीनंतर तीनच महिन्यात हे काम थांबवले आहे. या तीन महिन्यात मनपाकडून केवळ २०० भटक्या श्वानांवर ही शस्त्रक्रिया होऊ शकली.

मनपाने श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम थांबवून आता ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला असून, शहरातील भटक्या श्वानांची संख्या १९ हजारांच्या घरात गेली आहे. शहरात वाढत जाणाऱ्या या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्याचा घटना पाहता, नागरिकांमध्ये कमालीची भीती पाहायला मिळत आहे. शहरातील वाढीव भागात याचा सर्वाधिक धोका असून, याबाबत मनपाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर या संस्थेनेच हे काम थांबविल्याने मनपाकडून शहरातील या भीषण समस्येबाबत आतापर्यंत कोणताही ठोस पाठपुरावा झालेला नाही.

हजारो श्वानांसाठी व्यवस्थाच नाही

शहरातील श्वानांची संख्या आता १९ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, मनपाकडून कोणतेही नियोजन नसल्याने ही संख्या याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच मनपाकडून आधी डॉग व्हॅनद्वारे श्वान पकडल्यानंतर त्यांना शहराबाहेर सोडण्यात येत होते. मात्र, हे कामदेखील आता बंद आहे.

वाघ नगर, शिवाजी नगर भागात दहशत

शहरातील वाढीव भागासह शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांलगत भटक्या श्वानांची सर्वाधिक भीती आहे. यामध्ये वाघ नगर भागात गेल्या पंधरा दिवसात भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या १५पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. यासह निमखेडी, शिरसोली रस्ता, शिवाजी नगरसह कांचन नगर, आसोदा रोड, कानळदा रोड या परिसरातही श्वानांची सर्वाधिक भीती आहे.

दररोज ५ घटना

शहरातील भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरात सरासरी अशा ५ घटना होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोट..

शहरातील समस्यांबाबत ॲनिमल वेलफेअर संस्थेशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून, शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येबाबतची माहिती दिली आहे. केंद्राकडून सूचना आल्यानंतर याविषयी तत्काळ नियोजन करण्यात येईल.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा