शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आत्मदहनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील १५०० गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात गेल्या पंधरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या १६ अव्यावसायिक मार्केटमधील १५०० गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. गाळेधारकांचा पंधरा दिवसांपासून संप सुरू असतानादेखील मनपा प्रशासन गाळेधारकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने आता गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहनासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबत बुधवारी गाळेधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसीम काझी, रमेश तलरेजा, हेमंत परदेशी, संजय अमृतकर, सुजित किनगे, रिजवान जागीरदार, प्रकाश गगनानी, शिरीष थोरात, शंकर रामचंदानी, राजेश समदाणी व गाळेधारक उपस्थित होते. बुधवारी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे यांच्या उपस्थितीत सर्व १६ अव्यावसायिक, अविकसित मार्केटचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत गाळेधारकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आता आत्मदहनाशिवाय कोणताही पर्याय नाही

गेल्या वर्षापासून सर्व व्यापारी कोरोनासारख्या महामारीला तोंड देत आहेत. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे साधारणतः १२० दिवस शहरातील व्यवसाय धंदे बंद होते व आताही तिच कोरोनाची परिस्थिती उद‌्भवलेली असताना मनपा प्रशासनाची मनमानी भूमिका बदललेली नाही. आमच्या कुवतीनुसार कर्ज काढून थोडे थोडे पैसे भरूनही आम्हाला आमचे गाळे परत मिळणार याची शाश्वती नाही. प्रचंड भय,तणाव व आर्थिक संकटात सापडलेला गाळेधारक लाखोंची बिले भरू शकणार नाही. परिवाराला दोन घास खाऊ घालता येईल की नाही या विवंचनेत असलेल्या गाळेधारकांना मनपा प्रशासन लाखो रुपयांच्या वसुलीसाठी धमकावत आहे. त्यामुळे आता आत्मदहनाशिवाय मार्ग राहिलेला नाही, अशी भूमिका गाळेधारकांनी बुधवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

घर विक्री करूनही आम्ही मनपाची रक्कम भरू शकणार नाही

महानगरपालिकेकडून अन्यायकारक भाड्याची मागणी गाळेधारकांकडे केली जात आहे. इतकी रक्कम गाळेधारक आपले घरदार विकूनसुद्धा भरू शकत नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनाने गाळेधारकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, मनपा प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच कुटुंबासोबतच सर्व गाळेधारक आत्मदहन करतील, असा इशारादेखील गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील निवेदन देण्यात येणार असून, या काळात कोणतेही गाळेधारकांचे काहीही बरेवाईट झाल्यास किंवा कोणत्याही गाळेधारकाने आत्महत्या केली किंवा त्याचा जीव गेल्यास त्याला सर्वस्व महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही गाळेधारकांतर्फे सांगण्यात आले.