शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सर्व शक्ती सेनेतर्फे रमजान ईद निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:16 AM

जळगाव : सर्व शक्ती सेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते नुकतेच रमजान ईदनिमित्त ताबापुरा व हारिविठ्ठल ...

जळगाव : सर्व शक्ती सेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते नुकतेच रमजान ईदनिमित्त ताबापुरा व हारिविठ्ठल नगर येथे शिरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. सुनील तायडे, महेंद्र सुरवाडे, कृष्णा सावळे, सचिन सुरवाडे, प्रज्ञारत्न मोरे, सुनील ठाकरे, श्रीरंग सुरवाडे, सकावत शाह, शिकदर तडवी, रमजान तडवी, आरिफ शेख, शकील शेख, कृष्णा सावळे, प्रा. साबीर शेख उपस्थित होते.

हजरत बिलालतर्फे कपडे वाटप

जळगाव : हजरत बिलालतर्फे रमजान ईद व अक्षय तृतीयेनिमित्त शिवाजीनगर येथे नागरिकांना आंबे, कपडे व शिरखुर्माचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सैय्यद अकिल पहेलवान, अकिल इस्माईल, प्रा. रफिक शेख, मजिद शेठ, मसूद खान, फिरोज पठाण, सैय्यद अकिल पहेलवान, आदी समाज बांधव उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य वाटप

जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिरातर्फे शहरातील विविध भागातील दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अध्यक्ष शाम कोगटा, मनोज चौधरी, योगेश जाधव, पवन ठाकूर, अजय साळुंखे, गणेश गायकवाड, कुणाल बडगुजर, रोहित कोगटा, विजू बारी, केतन बारी, विलास बारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, मंदिर प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

नवीन बसस्थानकातील पाणपोई अद्यापही बंदच

जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बसस्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, सध्या संचारबंदीत स्थानकावर प्रवाशांची संख्या कमी असली तरी, येथील कर्मचाऱ्यांना मात्र ही पाणपोई बंद असल्यामुळे दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे.

बिबानगर येथे कमी दाबाने वीज पुरवठा

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून बिबानगर येथे अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे घरातील उपकरणे पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्यात यामुळे नागरिकांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

दूध फेडरेशन कडील रस्त्यांची दुरवस्था

जळगाव : सूरत रेल्वे गेटकडून दूध फेडरेशनकडे जणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर वाहनधारकांचे अधीकच हाल होत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.