शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आता इथेही सीमावाद... महाराष्ट्रातील ४ गावे मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 14:16 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटकने दावा केला आहे

जयदेव वानखडे

जळगाव जामोद (बुलढाणा) : जळगाव जामोद तालुक्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी या चार गावांतील नागरिकांनी सोयी सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच ग्रामस्थांकडून शासनाला निवेदन देणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटकने दावा केला आहे. तर महाराष्ट्रातील काही गावांनीसुद्धा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता सातपुड्यातील आदिवासी गावांमध्ये सोयीसुविधेअभावी महाराष्ट्र सोडण्याची भावना वाढीस लागत आहे. जळगाव जामोद तालुका हा मध्य प्रदेशाच्या सीमेवर असून सातपुडा पर्वतामध्ये तीनखुटी या ठिकाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाची सीमा आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत बुऱ्हानपूर जिल्हा लागून आहे आणि या सीमेलगत आदिवासी गावे वसलेली आहेत. त्यामध्ये १९ आदिवासी गावांचा समावेश आहे. तर भिंगारा, गोमाल आणि चाळीसटापरी ही चार गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. या गावांना पक्का रस्ता नाही. पाण्याची सुविधा नाही. वीज नाही. त्यामुळे शासन दरबारी चकरा मारून ग्रामस्थ थकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे आदिवासी असूनही त्यांना आदिवासींचे जात प्रमाणपत्र शासनाकडून मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या आदिवासींच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. या अनेक कारणांमुळे हे आदिवासी उद्विग्न झाले असून शासन आणि राजकारण्यांपासून सर्वजण उदासीन आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र सोडण्याचा त्यांनी हा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात राहून काय करणार

या ठिकाणी आदिवासी मूळ रहिवासी आहोत. आम्हांला या जंगलाचे मालक म्हटले जाते. परंतु, आमच्याकडे शेती नाही. पाण्याची सुविधा नाही. गावात वीज नाही. जायला रस्ता नाही. जंगलाची वाट किती दिवस तुडवायची, आमचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. या परिस्थितीत त्रस्त असून फिर्याद कोणीही घ्यायला तयार नाही. तेव्हा मध्य प्रदेशातच गेलेले बरे.- सरदार आवाशे, आदिवासी तरुण, भिंगारा 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकJalgaonजळगावMadhya Pradeshमध्य प्रदेश