शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महावितरणच्या आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेतून पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:51 IST

‘सांबरी’ व ‘फेस टु फेस’ला रसिकांची भरभरून दाद

ठळक मुद्देनाटकातून विविध संदेशकला जोपासण्यासाठी नाट्यस्पर्धा आवश्यक

जळगाव : महावितरणच्यावतीने आयोजित आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘सांबरी’ व ‘फेस टु फेस’ या नाटकांनी विविध सामाजिक संदेश देण्यासह याद्वारे अभियनाच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे दर्शन कलावंतांनी घडविले. उत्कंठा शिगेला पोहचविऱ्या या नाटकांनी रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवत त्यांची भरभरून दाद मिळविली.महावितरणच्यावतीने आयोजित आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा जळगावला मिळाला असून त्याचे उद्घाटन शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे गुरुवारी झाले. मंचावर जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता संतोष वाहणे, अधीक्षक अभियंता फारुख शेख, चंद्रशेखर मानकर, प्रकाश पौणिकर, परिक्षक म्हणून चंद्रकांत अत्रे, डॉ. हेमंत कुलकर्णी, शुभांगी पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सहाय्यक महाव्यवस्थापक मानव संसाधन धैर्यशील गायकवाड यांनी केले.योगशिक्षिका डॉ.अनिता पाटील यांच्या पथकाने योग गणेशवंदना सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर जळगाव परिमंडळाने शैलेश गोजमगुंडे लिखित ‘सांबरी’हे नाटक सादर केले. दुपारच्या सत्रात नांदेड परिमंडळाने सुहास देशपांडे लिखित ‘फेस टु फेस’ हे नाटक सादर केले.कला जोपासण्यासाठी नाट्यस्पर्धा आवश्यककर्मचाºयांमधील कला जोपासण्यासाठी नाट्यस्पर्धा आवश्यक असून त्यामुळे कला गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी आभार मानले.‘सांबरी’ने जिंकली मनेजळगाव परिमंडळाच्या नाट्यसंघाने सादर केलेल्या पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश देणाºया ‘सांबरी’ या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कर्मचारी कलांकारांच्या दर्जेदार सादरीकरणामुळे उपस्थित भारावले. या नाटकाचे दिग्दर्शन पराग चौधरी यांनी केले. या नाटकात मुकेश अहिरे, सचिन भावसार, दिपक कोळी, युगंधरा ओहोळ, संकेत राऊत, दिपाली सोनार, किशोर मराठे, प्रदिप भंगाळे, रवींद्र चौधरी, मोना बारेला, कमलेश भोळे, राजेंद्र आमोदकर ,पूनम थोरवे, उमेश गोसावी आदी कर्मचारी कलाकारांनी भूमिका साकारली. बालकलाकार गोरक्ष कोळी यानेही रसिकांची मने जिंकली.‘फेस टु फेस’ने उत्कंठा वाढविलीनांदेड परिमंडळाच्या नाट्यसंघाने सादर केलेल्या ‘फेस टु फेस’ या नाटकाने प्रेक्षकांची उत्कंठा टिकवून ठेवली. चेहरा बदललेला नायक आपली मूळ ओळख पटवून देण्यासाठीचा खटाटोप करतो, मात्र त्यावर विश्वास ठेवावा की नाही या व्दिधा मनस्थितीतील नायिका प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळाली. या नाटकाचे दिग्दर्शन धनंजय पवार यांनी केले. या नाटकात प्रमोद देशमुख, राजकुमार सिंदगीकर, ऋतुजा रत्नपारखी, सतीश निशाणकर, पुर्वा देशमुख आदी कर्मचारी कलाकारांनी अभिनय केला.सहव्यवस्थापकीय संचालक अनुपस्थितनाट्यस्पर्धेचे उद्घाटन औरंगाबाद विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याहस्ते होणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे ते उपस्थित राहू न शकल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव