शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अ-अभिनयाचा अ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:29 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वेध नाटकाचा’ या सदरात नाट्यकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी लिहिताहेत....

नाटक हा विषयच जणू एखाद्या अथांग सागरासारखा आहे. त्यात जितकी बुडी माराल, तितके खोलवर जाल तितके मौल्यवान विचाराने मौक्तिक गवसतील. मग नाट्यलेखन असो, अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा तंत्र असो असे अनेक विषय ज्याचे नाटक वर्चस्व आहे त्यांना सतत मोहात टाकतात व त्याच्या सान्निध्यात स्वर्गीय सुखाचा आनंद देतात.आपण लहान असताना सर्वप्रथम जी मुळाक्षरं शिकलो त्यातलं पहिलं अक्षर असतं ते अ. अ या अक्षरापासून सुरूवात होते. तसंच नाटक प्रत्यक्ष कृतीत येताना अभिनय ही पहिली पायरी असते. नाटककाराचे शब्द आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी नटाला करावा लागतो तो अभिनय. खरं तर अभिनय ही करण्याची गोष्ट नाही. अभिनय हा करावा लागत नाही. तो होत असतो. नटाची देहबोली, नटाचा आवाज, त्याच्या वाट्याला आलेले संवाद यांच्या मदतीने जे काही नट करतो त्या कृतीचा परिपाक म्हणून त्या नटाच्या चेहऱ्यावर जे काही उमटतं ज्याला नाटकिय परिभाषेत मुद्राभिनय असे म्हणतात तर असा मुद्रेसहित जे काही प्रेक्षक अनुभवतो त्याला अभिनय म्हणता येईल.माणूस हा जन्मजात नट आहे. जगण्यात त्याला पदोपदी या अभिनयाचा सहारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या घ्यावा लागतो. कधी खºयासाठी तर कधी खोट्यासाठी तो अभिनयाचा वापर मोठ्या कौशल्याने करीत असतो. त्याला आपल्या या उपजत असलेल्या गुणांची कदाचित जाणिव नसते.पण ज्याला नट व्हायचं आहे त्याला ती होते आणि मग तो त्या अभिनयाचा रियाज करू लागतो.नाटकाच्या शास्त्रात अभिनय करणाºया नटाला अ‍ॅथलिटची उपमा दिलेली आहे. एखाद्या अ‍ॅथलिटसारखे चपळ, सजग, उत्स्फूर्त हालचाली करणारे शरीर असलेली व्यक्ती नट होण्यास योग्य आहे. किंबहुना नटाचे तसे असले पाहिजे असे म्हटले आहे. गायकाला संगीताचा अभ्यास करताना आपल्या आवाजासाठी रियाज करावा लागतो. संगीतातले प्राथमिक स्वर अभ्यासताना आवाजाचा स्तर शोधाव लागतो. त्याला खालच्या आवाजात गाता आलं पाहिजे तसच त्याला वरच्या सूर पकडता आला पाहिजे. जस गाण्याचं आहे तसंच अभियनाच आहे. नटाचा आवाज हा संगीतातल्या प्रमाणे तीन ही सप्रकात सफाईने आणि ताकदीने सहजगत्या फिरला पाहिजे. त्यासोबत शब्दांचे उच्चार, भाषेचा अभ्यास, स्वरांचे आरोह अवरोह असे अनेक प्रकारचे परिमाणं लावत त्याच्या वाचेचा अर्थात वाचिक अभिनयाचा रियाज होतो. अभिनय ही एकट्याने करण्याची जशी गोष्ट आहे तशी दुसºयासोबत सुद्धा तो करावा लागतो. अभियनात स्वत: करणे हे जसे महत्वाचे असते तसे समोरचा दुसरा जे काही करतो त्याला रिस्पॉण्ड करणे तितकेच महत्वाचे असते. समोरचा बोलत आहे व मी ते ऐकतो आहे हे ऐकणं फार महत्वाचे आहे. हा अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शनचा खेळ अभियनात फार महत्वाचा ठरतो. गाण्यात ताल, लयीला जितके अनन्यसाधारण महत्व आहे तितकेच अभिनयात पण आहे. तोल सुटलेल्या दारुड्याचा अभिनय करताना सुद्धा त्याचा ताल व लय संभाळणे महत्वाचे आहे. तरच ती भूमिका संस्मरणीय ठरते. साधं बोलणं जर ताल लयीला जर सोडून असेल ते एकायला त्रासदायक होतं. असा प्रत्येकाचा अनुभव आहे. एखादा कीर्तनकाराचे निरुपण का आवडते तर ते बुवा गाणं गोड गातात म्हणून नाही तर त्यांचे बोलणे हे अत्यंत तालात व लयीत असते म्हणून भाषेचा वापर, आवाजातील चढउतार, भावनेचा परिपोष यामुळे बुवांच कीर्तन, प्रवचन हे रसाळ होतं. तसचं नटाचं बोलणं हे ऐकावयास वाटलं पाहिजे, मग तो भूमिका कोणतीही असो. तो जे काही संवाद म्हणेल व त्या सोबत जी काही भूमिकेबरहुकूम हालचाली करेल त्या संयुक्तिक वाटतील.अभिनय कला ही उपजत असते किंवा नट हा जन्माला यावा लागतो हा अत्यंत पुरातन असा वाद आहे व तो आजही सुरू आहे. कोणतीही कला ही अथक व योग्य दिशेने जर प्रयत्न केले तर साध्य होते. अभिनय हा केवळ शब्द, हालचालीत नसतो. त्यासाठी आंतरीक तयारी महत्वाची असते. भूमिकेचा केलेला अभ्यास, विचार, त्यावर केलेले वाचन, चिंतन मनन या सगळ्यावरच त्याच्या भूमिकेची उंची ठरत असते. जितका विचार खोल तितकी त्या भूमिकेची उंची वाढत जाते.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव