शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

स्त्री ही कितीही हतबल असली तरी आई म्हणून सर्वाधिक ताकदवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:49 AM

स्त्री ही एक महिला म्हणून कितीही हतबल असली, तरी आई म्हणून सर्वाधिक ताकदवान आहे. आईसारखे कोणीही ताकदवान नाही.

जळगाव : स्त्री ही एक महिला म्हणून कितीही हतबल असली, तरी आई म्हणून सर्वाधिक ताकदवान आहे. आईसारखे कोणीही ताकदवान नाही. आईच्या मायेची संजीवनी सारखे कोणतेही रामबाण औषध त्रिखंडात सापडणार नाही, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी निला सत्यनारायण यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ‘आश्रय माझ घर’ या मतिमंद मुलांसाठीच्या (विशेष मुलासाठी) संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्ष्यस्थानी जैन श्रावकसंघाचे मंत्री कस्तुरचंद बाफना होते. व्यासपीठावर ‘आश्रय’चे उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव होते.निला सत्यनारायण म्हणाल्या की, एका मतिमंद मुलाची आई या नात्याने मी सांगू इच्छिते की, आश्रयसारख्या संस्था जागोजागी हव्या. कितीजरी श्रीमंत आईबाप असले तरीही ते आपल्या विशेष मुलासाठी सवंगडी मिळवून देऊ शकत नाहीत. ते आश्रयसारख्या संस्थेतच मिळतात. सवंगडी मिळवून देण्याचे काम ही संस्था करतेय. ही कौतुकास्पद बाब आहे.कारण विशेष मुले ही लहान असतात तेव्हा आईवडिल त्यांचा सांभाळ करू शकतात. मात्र ही मुले मोठी होतात. त्यांच्यातील ताकदही वाढते. आणि आईवडिल म्हातारे होतात. तेव्हा या मुलांचा सांभाळ करणे त्यांना अवघड होते. आपल्यानंतर या मुलांचा सांभाळ कोण करणार? अशी चिंता सतावायला लागते. अशा पालकांसाठी आश्रम ही संस्था निश्चितच दिलासा आहे. मात्र अनेक पालकांना ही विशेष मुल अडसर वाटतात. तसेच बाहेर सोबत न्यायायलाही कमीपणाचे वाटते. अशा पालकांना ही विशेष मुले बोझ वाटतात. त्यांची मुले आश्रयने सांभाळायला घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. कारण या मुलांना आश्रयसारख्या संस्थेत मिळणारे सवंगडी तर हवेतच त्यासोबत आई-वडिलांचे प्रेमही मिळायला हवे.त्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे मांडण्यात आलेली ‘डे-केअर’ सेंटरची संकल्पना अधिक स्तुत्य असून ती संकल्पना उचलून धरावी. त्यासाठी गरज भासल्यास मदतीसाठी नेहमीच तयार राहू, असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात कस्तुरचंद बाफना यांनी ‘आश्रय’च्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात डॉ.प्रताप जाधव यांनी ‘आश्रय’च्या वाटचालीची माहिती देऊन केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे लवकरच ‘डे-केअर’ सेंटरही सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.