शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षित कर्जावर ना बोझा ना कर्जदारांच्या मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेतील असुरक्षित कर्जाची रक्कम जवळपास १३५ कोटींच्या घरात ...

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेतील असुरक्षित कर्जाची रक्कम जवळपास १३५ कोटींच्या घरात असून या कर्जाबाबत बोझा बसविला गेला नाही की संबंधित कर्जदारांचा शोध घेतला गेला नाही. यामुळे संस्थेची वसुली होऊ शकली नाही व यासाठी अवसायकांनी पाठपुरावादेखील केला नसल्याचा आरोप केला जात आहे.

बीएचआर संस्थेतील अपहार व इतर कारणांमुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात चौकशी करण्यात आली. या प्रकारामुळे अवसायकाचा कारभार समोर येत असून संस्था अवसायनात गेल्यानंतर कर्जाच्या वसुलीसाठी आवश्यक बाब होऊ शकलेल्या नाही. लेखापरीक्षणास टाळाटाळ करण्यासह अवसायकांनी असुरक्षित कर्जदारांच्या मालमत्तादेखील शोधल्या नाही.

कोणतेही तारण नसताना नातेवाईकांना कर्जाचे वाटप

बीएचआर संस्थेचे जे असुरक्षित कर्ज आहे, त्याचा वितार केला तर ते संचालक व त्यांच्या नातेवाईकांनाच वाटप केले गेले आहे. यामध्ये ४५ मोठे कर्जदार यासाठी कोणतेही तारण नाही. त्यामुळे हे कर्ज असुरक्षित असून ज‌वळपास हे कर्ज १३५ कोटी रुपयांच्या घरात आहे.

संचालकांनी केले वाटप, अवसायकांनी केले दुर्लक्ष

कोणतेही तारण न घेता संचालकांनी एक प्रकारे कोट्यवधींच्या कर्जाची खैरातच वाटप केल्याचे चित्र आहे. संचालकांनी हे कर्ज वाटप केले असले तरी संस्था अवसायनात गेल्यानंतर या असुरक्षित कर्जधारकांचा अवसायकांनी शोध घेणे गरजेचे होते. मात्र अवसायकांनी तसे न करता केवळ पावत्यांचाच शोध घेतला व टक्केवारीवर भर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शोधच नसल्याने बोझाही नाही

संस्थेचे जे असुरक्षित कर्ज आहे, त्या कर्जदारांचा शोध घेऊन त्यावर बोझा बसविणे गरजेेचे होते. अवसायकाला हे अधिकार असले तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्याने असुरक्षित कर्जाचा शोध घेतलाच नाही, त्यामुळे अशा कर्जदारांच्या मालमत्तांवर बोझाही बसविला गेला नाही. यामुळे कर्जदारही निश्चिंत झाले. मात्र ठेवीदार वाऱ्यावर सोडले गेले. ज्यांनी पावत्या देऊन टक्केवारी मान्य केली, त्यांना मोेठा आर्थिक भूर्दंड यामुळे सहन करावा लागला.

लेखापरीक्षण नसल्याने त्रुटी नाही व गुन्हेही दाखल नाही

अवसायकाने संस्थेचे लेखापरीक्षण करण्याकडे दुर्लक्ष केल्याने कर्जाबाबत काय घोळ‌ आहे तसेच वसुली किती व ठेवीदारांना किती ठेवी दिल्या गेल्या हे स्पष्ट होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील कारवाईदेखील होऊ शकलेली नाही. संस्थेच्या कारभाराबाबत काही जणांनी माहिती मागितली असता अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सांगितले होते की, लेखापरीक्षणात काही आक्षेप, त्रुटी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही गेल्या पाच वर्षात घडले नाही. त्यामुळे संस्थेच्या ठेवी वसूल होतील तरी कशा व ठेवीदारांना ठेवी कशा मिळतील, असा प्रश्न अवसायक आल्यानंतरही कायम राहिला.