शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती टिकविण्यासाठी राष्ट्रभाषेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

जिजाबराव वाघ चाळीसगाव : वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाणारे राजकारण भाषेच्या प्रांतातही आहेच. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर ...

जिजाबराव वाघ

चाळीसगाव : वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाणारे राजकारण भाषेच्या प्रांतातही आहेच. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर हे राजकारण जाणीवपूर्वक थांबवावे लागेल. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचादेखील मान राखला गेला पाहिजे. संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हिंदीशिवाय पर्याय नाही, असे मत हिंदी अभ्यासकांनी व्यक्त केले.

राष्ट्रभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला 'लोकमत'ने या अभ्यासकांची मते जाणून घेतली. हिंदीचा वापर वाढतोय, मात्र क्षेत्र मर्यादितच आहे.

चौकट 1...आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असणे जसे आवश्यक आहे, त्याप्रमाणे जीवनात यश मिळवायचे असेल तर राजभाषाही शिकलीच पाहिजे. कारण आपल्या देशाची भाषा आणि संस्कृती महत्त्वाची मानली जाते.

2... हिंदी भाषेचा प्रयोग खूप वाढला. मात्र क्षेत्र मर्यादित आहे, ते व्यापक व्हायला हवे. व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात आजही इंग्रजीचा मोठा वापर होतो

. 3...हिंदी भाषा व्यापारात व तंत्रज्ञानात यायला हवी. उच्चशिक्षणात केवळ साहित्यिकांचे अध्ययन पुरेसे नाही, त्याव्यतिरिक्त हिंदीला कामकाजाची भाषा, व्यावहारिक भाषेच्या रूपात शिकविणे गरजेचे आहे.

4. आता वैश्विक स्तरावर मान्यता मिळणे, ही राष्ट्रभाषेची निकड आहे.

5.. हिंदीच्या विद्यार्थ्यांनी सखोल अध्ययनाकडे वळणे ही गरज आहे.

अभ्यासकांच्या चर्चेतील सूर...

१) मराठीसह भोजपुरी, बिहारी, हिंदी आदी भाषांचा उगम संस्कृतमधून झाला आहे. साहजिकच उत्तर भारतीयांना हिंदी भाषा खूप जवळची वाटते. परस्परविरोधी ही दोन टोके आहेत. हिंदीचा विश्वस्तरावर प्रसार होण्यासाठी अगोदर देशस्तरावरील अडचणी दूर कराव्या लागतील.

- प्रा. डॉ. जिजाबराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र हिंदी भाषा परिषद, पाचोरा

२) आजही राष्ट्रभाषेची दयनीय अवस्था आहे. हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजात उपयोग करून घेतला जात नाही. बँकांमध्ये हिंदी भाषेचा वापर अनिवार्य असतानाही येथे इंग्रजीचा वारू उधळलेला दिसतो. भाषेच्या अभ्यासातही अगदी केजी ते पीजीपर्यंत विद्यार्थ्यांची गळती आहे. शासकीय पातळीवर सन्मानाऐवजी अवहेलना अधिक होते. कार्यालयांमध्ये हिंदीची सर्रास गळचेपी केली जाते. शिक्षणात व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लागल्याने भाषेचे महत्त्व कमी झाले आहे. - प्रा. डॉ. सुनीता कावळे, प्रमुख, हिंदी विभाग, चाळीसगाव महाविद्यालय

३) संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले. आजही हिंदीला तिचा मान मिळालेला नाही. राष्ट्रीय, सामाजिक व वैश्विक एकतेसाठी हिंदी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आहे. जगाला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची असेल तर हिंदीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला गेला पाहिजे. -प्रवीण रमेश ठाकूर, शिक्षक, पिलखोड, ता. चाळीसगाव

फोटो