शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

संस्कृती टिकविण्यासाठी राष्ट्रभाषेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

जिजाबराव वाघ चाळीसगाव : वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाणारे राजकारण भाषेच्या प्रांतातही आहेच. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर ...

जिजाबराव वाघ

चाळीसगाव : वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाणारे राजकारण भाषेच्या प्रांतातही आहेच. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर हे राजकारण जाणीवपूर्वक थांबवावे लागेल. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचादेखील मान राखला गेला पाहिजे. संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हिंदीशिवाय पर्याय नाही, असे मत हिंदी अभ्यासकांनी व्यक्त केले.

राष्ट्रभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला 'लोकमत'ने या अभ्यासकांची मते जाणून घेतली. हिंदीचा वापर वाढतोय, मात्र क्षेत्र मर्यादितच आहे.

चौकट 1...आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असणे जसे आवश्यक आहे, त्याप्रमाणे जीवनात यश मिळवायचे असेल तर राजभाषाही शिकलीच पाहिजे. कारण आपल्या देशाची भाषा आणि संस्कृती महत्त्वाची मानली जाते.

2... हिंदी भाषेचा प्रयोग खूप वाढला. मात्र क्षेत्र मर्यादित आहे, ते व्यापक व्हायला हवे. व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात आजही इंग्रजीचा मोठा वापर होतो

. 3...हिंदी भाषा व्यापारात व तंत्रज्ञानात यायला हवी. उच्चशिक्षणात केवळ साहित्यिकांचे अध्ययन पुरेसे नाही, त्याव्यतिरिक्त हिंदीला कामकाजाची भाषा, व्यावहारिक भाषेच्या रूपात शिकविणे गरजेचे आहे.

4. आता वैश्विक स्तरावर मान्यता मिळणे, ही राष्ट्रभाषेची निकड आहे.

5.. हिंदीच्या विद्यार्थ्यांनी सखोल अध्ययनाकडे वळणे ही गरज आहे.

अभ्यासकांच्या चर्चेतील सूर...

१) मराठीसह भोजपुरी, बिहारी, हिंदी आदी भाषांचा उगम संस्कृतमधून झाला आहे. साहजिकच उत्तर भारतीयांना हिंदी भाषा खूप जवळची वाटते. परस्परविरोधी ही दोन टोके आहेत. हिंदीचा विश्वस्तरावर प्रसार होण्यासाठी अगोदर देशस्तरावरील अडचणी दूर कराव्या लागतील.

- प्रा. डॉ. जिजाबराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र हिंदी भाषा परिषद, पाचोरा

२) आजही राष्ट्रभाषेची दयनीय अवस्था आहे. हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजात उपयोग करून घेतला जात नाही. बँकांमध्ये हिंदी भाषेचा वापर अनिवार्य असतानाही येथे इंग्रजीचा वारू उधळलेला दिसतो. भाषेच्या अभ्यासातही अगदी केजी ते पीजीपर्यंत विद्यार्थ्यांची गळती आहे. शासकीय पातळीवर सन्मानाऐवजी अवहेलना अधिक होते. कार्यालयांमध्ये हिंदीची सर्रास गळचेपी केली जाते. शिक्षणात व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लागल्याने भाषेचे महत्त्व कमी झाले आहे. - प्रा. डॉ. सुनीता कावळे, प्रमुख, हिंदी विभाग, चाळीसगाव महाविद्यालय

३) संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले. आजही हिंदीला तिचा मान मिळालेला नाही. राष्ट्रीय, सामाजिक व वैश्विक एकतेसाठी हिंदी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आहे. जगाला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची असेल तर हिंदीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला गेला पाहिजे. -प्रवीण रमेश ठाकूर, शिक्षक, पिलखोड, ता. चाळीसगाव

फोटो