शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

न्याय व समता टिकविण्यासाठी एकत्र लढा देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:23 PM

मेधा पाटकर । संविधान वाळवी लागल्यासारखे पोखरले जातेय याची खंत

अमळनेर : संविधानात असलेल्या न्यायपूर्ण, समाजवादी, समतावादी अधिकारांवर गदा येत असून शब्दांना असलेले मूल्य संपत चालले आहे. म्हणून संविधान धोक्यात असून कायद्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. संविधानातील एक एक भाग वाळवी लागल्यासारखा पोखरला जात आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.राष्ट्रसेवा दल, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी विचार मंचाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ विवेक जागर कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय संविधान धोक्यात?’ या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अनेक वर्षांनंतर प्रथमच मेधा पाटकर व प्रतिभा शिंदे एकत्र आल्या.रमेश लंकेश्वर, राजेंद्र चौधरी, प्रा.राजेंद्र वैद्य, दिनेश संकलेच, दिनेश वाल्हे, गुलाब शिंगाणे, उदय कापुरे, अजित शेख, जगदीश तावडे या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या समरणार्थ व्यख्यान आयोजित केले होते.पाटकर पुढे म्हणाल्या की, संविधानातील मूल्ये जपण्यासाठी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. संविधानातील लिहिलेल्या गोष्टींचे पालन होत नसेल तर आपल्याला लढावेच लागेल. शिक्षणातील व्यापक विचारांवरील हल्ल्यांबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. हे सरकार १४४ कायदे रद्द करू पाहत आहे. म्हणून एकता आणि एकजूट ठेवावी. तसेच २९ रोजी बहुजन क्रांती मेर्चातर्फे भारत बंद व ३० रोजी अहिंसा साखळी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार अनिल पाटील, माजी उपजिल्हाधिकारी एच.टी. माळी, साहित्यिक कृष्णा पाटील, सानेगुरुजी वाचनालायचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, कामगार संघटनेचे सोमचंद संदनशिव, एस.डी. देशमुख, बन्सीलाल भागवत, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, भारती गाला, गो.पी.लांडगे, रत्नदीप सिसोदिया, वीज कर्मचारी संघटनेचे पी.वाय. पाटील, वसुंधरा लांडगे, मंगला पवार, प्रदीप पाटील, डॉ. रवींद्र पाटील, धनगर पाटील, डॉ.जयश्री पाटील, रणजित शिंदे, उदय खैरनार, गौतम सपकाळे, कैलास बहारे, रवी पांडे, प्रा.लीलाधर पाटील, सानेगुरुजी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.