शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

वाघूर धरणसाठा नव्वदीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:07 AM

सात दिवसात सहा टक्क्यांनी वाढ

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.५६ टीएमसी  उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या सात दिवसात वाघूर धरणाच्या साठ्यात ६.०७ टक्कांनी वाढ झाली आहे. तर अंभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, तोंडापूर व हिवरा हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.जळगावात पाऊस गायब असताना ‘वाघूर’मध्ये वाढगेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली आहे. यामुळे बळीराजाची चिंता वाढत आहे. सोबतच उकाडाही कायम असल्याने सर्वांना नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जळगावात पाऊस गायब असला तरी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगामध्ये दररोज मुसळधार पाऊस होत असल्याने वाघूर नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीला सलग पूर सुरू असून जळगावनजीकच्या वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळेच गेल्या सात दिवसांमध्ये ध्नरणाच्या साठ्यात ६.०७ टक्क्यांनी वाढ होऊन धरण साठा ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे जळगाव व जामनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५२.९९  टीएमसी आहे.तीनही धरणांच्या साठ्यात वाढसलग पाऊस सुरू असल्याने वाघूर, गिरणा, हतनूर  धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. यात वाघूर धरण साठ्यात तर २५ दिवसात १६.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो आता ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. अशाच प्रकारे गिरणा धरणात ६ जुलै रोजी ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला व आता हा साठा ४५.६३ टक्के झाला आहे. हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या १४.७५ टक्के साठा आहे.  जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१०  दलघमी म्हणजेच ३६.२६  टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये ४९७.२४  दलघमी म्हणजेच १७.५६  टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.३३ टीएमसी, गिरणा ८.४४ टीएमसी तर वाघूर धरणात ७.७९ टीएमसी  उपयुक्त साठा आहे.  तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२०  टीएमसी  आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात  ४६.२९  दलघमी म्हणजेच ६.९३  टीएमसी  उपयुक्तसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव