शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांना ‘म्यूट’ केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST

अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना बोलू न देता आमचे भ्रमणध्वनी म्यूट करून एमडींनी ...

अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना बोलू न देता आमचे भ्रमणध्वनी म्यूट करून एमडींनी स्वतःच मंजूर मंजूर म्हणत ठराव मंजूर केल्याचा आरोप तालुक्यातील शिरूड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. सुभाष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

जेडीसीसी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात आली होती. जिल्ह्यात अंदाजे ७ ते ८ हजार सभासद असताना फक्त १२५ सभासद दिसून येत होते, असे सांगून प्रा. सुभाष पाटील म्हणाले की, मागीलवर्षी प्रत्येक पिकाला सारखे कर्ज मंजूर करावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी संचालकानी पुढील वर्षी अमलात आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? तसेच २०१९ ला मंजूर झालेला पीक विमा २५ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. जिल्हा बँकेच्या विम्यापोटी कमिशन मिळते. मात्र, बँक सोसायट्यांना माहिती सादर करण्याचे पैसे देत नाहीत. त्यामुळे सोसायट्यांची परिस्थिती खराब झाली आहे. जिल्हा बँकेचे एटीएम सुरू करा, इतर बँकेचे एटीएम बंद करा, मयताच्या वारसास पन्नास टक्के कर्ज देण्याऐवजी पूर्ण कर्ज द्यावे, आदी विषय मांडत असताना आम्हाला ‘म्यूट’ करण्यात आले. बोलू दिले नाही. त्यांनी ठराव मांडले तेव्हा सभासदाचे मोबाइल म्यूट करून ठेवले होते, असे ते म्हणाले.

एम.डी. जितेंद्र देशमुख यांनी स्वतः मंजूर मंजूर म्हणून ठराव मंजूर करून घेतले, असा आरोप प्रा. पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणवली जाणाऱ्या बँकेच्या सभेत शेतकऱ्यांना बोलू दिले जात नाही, ही बळीराजाची मुस्कटदाबी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

चौकट

शेतकऱ्यांना कापसाला ४० हजार कर्ज मिळते, ज्वारी मक्याला २८ हजार मिळते, उडीद मुगाला २४ हजार कर्ज मिळते आणि हे कर्ज पेरणीपूर्वी मेमध्ये मिळते म्हणून शेतकरी जादा कर्ज मिळावे म्हणून कापूस पिकाची नोंद करतो. मात्र, नंतर दुसरेच पीक घेतो, त्यामुळे त्याला विमा मिळत नाही.