शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पेरा नोंदणीत शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST

मतीन शेख लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तालुक्यातील २८ हजार १३१ कृषी खातेदार शेतकऱ्यांपैकी ९८१७ शेतकऱ्यांनी ई ...

मतीन शेख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : तालुक्यातील २८ हजार १३१ कृषी खातेदार शेतकऱ्यांपैकी ९८१७ शेतकऱ्यांनी ई -पीक पेरा नोंदणी केली आहे. विविध समस्यांवर मात करीत आतापर्यंत ३५ टक्के शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या नोंदणीला वाढीव मुदत देण्यात आली आहे. अशात शेतकऱ्यांना विविध समस्यांवर मात करून ई-पीक पेरा नोंद करण्याचे, तर प्रशासनाला उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान आहे.

शेतकऱ्यांना आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांच्या मोबाइलवर ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक शेतकरी अशिक्षित आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नाही. अनेकांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाहीत. नेटवर्क, सर्व्हर डाउन, तांत्रिक अडचणी आदी समस्यांमुळे ई-पीक पेरा नोंदणी करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या समस्यांवर मात करीत तालुक्यातील ३५ टक्के शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत ई-पीक नोंदणी केली आहे. पीक नोंदणीबाबत शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहता १४ सप्टेंबरपर्यंत असलेल्या मुदतीस वाढ देण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून पीक नोंदणी करता येणार आहे.

शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्यांद्वारे करण्याच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्जही दिले जाईल. तलाठी संख्या कमी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा आक्षेप असायचा. अशात पीक पेरणीची रिअल टाइम माहिती ॲप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे.

तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीकविमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. ई-पीक पेरा नोंदणीचे हे फायदे जरी असले तरी सध्या शेतकऱ्यांना ही नोंदणी करण्यास येणाऱ्या अडचणी मोठ्या आहेत. पीक नोंदणीसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले ॲप चालवता येत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. तसेच महसूल विभागाच्या वतीने तुलनात्मकदृष्ट्या कमी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

ई-पीक नोंदणीसाठी येत असलेल्या अडचणी

अनेक शेतकरी अशिक्षित आहेत.

बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाले नाही.

बहुतांश शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नाही.

अनेक शेतकऱ्यांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाहीत.

गाव व शेतीशिवारात मोबाइल नेटवर्क मिळत नाही.

सर्व्हर डाउन असल्यास नोंद होत नाही.

तांत्रिक अडचणी आदी समस्या आहेत.

तालुक्यातील स्थिती

तालुक्यातील एकूण गावे- ८१

एकूण कृषी खातेदार शेतकरी- २८,१३१

नोंदणी केलेले खातेदार शेतकरी- १०,३७८

ॲक्टिव्ह खातेदार शेतकरी- ९८१७