शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

दोन मुलांच्या आईने कुमारी सांगून केले तरुणाशी लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:47 PM

जळगाव : कुमारी असल्याचे सांगून दोन मुलांच्या आईने पाचोरा तालुक्यातील तरुणासोबत लग्न केले. त्याच्याकडून एक लाख रुपये रोकड आणि ...

जळगाव : कुमारी असल्याचे सांगून दोन मुलांच्या आईने पाचोरा तालुक्यातील तरुणासोबत लग्न केले. त्याच्याकडून एक लाख रुपये रोकड आणि १५ हजारांचे दागिने उकळले. हा प्रकार ३० जानेवारी २०१९ रोजी घडला. यात पतीने फसवणूक झाल्याची फिर्याद औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी अमोल रमेश देठेसह दोन महिलांविरुद्ध १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी दोन दलाल महिलांना अटक झाली आहे.पाचोरा तालुक्यातील श्रीराम विरभान पाटील यांच्या तक्रारीनुसार, त्यांची लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे ते मुलीच्या शोधात होते. दरम्यान, त्यांची औरंगाबादेतील अमोल रमेश देठे याच्याशी ओळख झाली. त्याला लग्नाबाबत सांगितले असता त्याने एका मुलीचे स्थळ असल्याचे पाटील यांना सांगितले. त्यानुसार, पाटील हे औरंगाबादेत आले. तेव्हा देठे आणि एका महिलेने सविता (नाव बदललेले आहे) हिची पाटीलसोबत ओळख करून दिली. पाटीलला सविता पसंद पडल्यानंतर त्यांचे लग्न ठरले. तेव्हा अनिताने कुमारी असल्याचे पाटील यांना सांगितले होते.सविताची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे सांगून देठे आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेने पाटीलकडून एक लाख रुपये रोकड आणि अंदाजे पंधरा हजार रुपयांचे दागिने करून घेतले. तेच दागिने सविताला लग्नात घातले होते. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी त्यांचा जळगाव येथे विवाह झाला होता. त्यानंतर आईची प्रकृती बिघडल्याचे सांगून सविता ही श्रीराम याला औरंगाबादला घेऊन आली. लघुशंकेचे नाव सागून ती गेली नंतर परत आलीच नाही. मात्र नंतर ती हरविली नसून स्वत:हून पळून गेली व तिला दोन मुले असल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव