शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वाकडीच्या बेपत्ता ग्रा.पं. सदस्याच्या शोधादरम्यान सापडले मानवी अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 8:45 PM

डीएनए चाचणीनंतर ओळख पटणार

पहूर, ता. जामनेर - वाकडी, ता. जामनेर येथील येथील बेपत्ता ग्रा.पं.सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे यांच्या शोधादरम्यान रविवारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर जवळील पिंप्री धरणात मानवी शरीराचे अवशेष आडळून आले. हे अवशेष नेमके कोणाचे आहे, याच्या तपासासाठी त्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, विनोद चांदणे यांचा घातपात केल्याचा संशय त्यांच्या भावांनी व्यक्त केला आहे .विनोद चांदणे हे १९ मार्चपासून बेपत्ता असून या प्रकरणी शनिवारी चार जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रविवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री धरणाजवळ पोहचले. दुपारी चार वाजता या ठिकाणी मानवी शरीराचे अवशेष आढळून आले. हे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले असून या वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर मृतदेहाची ओळख निष्पन्न होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले.रविवारी सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा ताफा पहूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी केशवराव पातोंड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, पिंपळगाव हरेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पहूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांच्या सोबत घटनेच्या तपासाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा ताफा विनोदचे अपहरण झालेल्या वाकडी धरणाच्या भिंतीजवळ घटनास्थळी पोहचला व माहिती जाणून घेतली. तेथून ते पहूर पोलीस ठाण्यात परतले. या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, पिंप्री येथील स्थानिक पोलीस पाटलाकडून घटनेच्या संदर्भात काही माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह सर्व ताफा पिंप्री धरणावर पोहचला. तेथे शोध मोहिमे दरम्यान राखेने भरलेल्या दोन गोण्या पाण्यात आढळून आल्या. तपासणी दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने राखेतून मृतदेहाचे अवशेषांचे वेगवेगळे नमुने घेतले. हे नमुने डीएनए चाचणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात येणार असून विनोदच्या भावांची ही डीएनए चाचणी घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या संदर्भात डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू असून मिळालेली अवशेषांची ओळख डीएनए चाचणीच्या वैद्यकीय अहवालानंतर निष्पन्न होईल. या क्षणाला या घटनेने बाबत काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अपहरण प्रकरणी अटक असलेले महेंद्र राजपूत, विनोद देशमुख व नामदार तडवी यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. रविवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस अधीक्षकांनी पीडित कुटुंबाची भेट नाकारल्याचा आरोपवाकडीत घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. उगले आले मात्र त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप विनोदचे भाऊ राजेंद्र चांदणे यांनी केला.वाकडीतील महिलांची पोलीस ठाण्यात धडककाही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. या पीडीत मुलींचे नातेवाईक रविवारी पहूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन या प्रकरणात माजी सरंपचाचा हात असल्याचा आरोप केला. त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी केली. 

टॅग्स :Jalgaonजळगाव