शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरण रब्बी आवर्तनात निम्मे खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 01:51 IST

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. ...

संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. म्हणजे १०० टक्के जलसाठा झाला होता. आजमितीस धरणात १२५९१ द.ल.घ.फु. इतका अर्थात मृतसाठा धरुन जवळजवळ ५०-५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
रब्बीसाठी गिरणा लाभक्षेत्रातील पाझंण, जामदा डावा-उजवा व दहीगाव कालव्यांना तीन आवर्तन देण्यात आले. ५ डिसेंबर रोजी गिरणा धरणातून आवर्तन सुरू झाले. रब्बी आवर्तनाचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. यात तीन आवर्तन देण्यात आले जवळजवळ ८-९ हजार द.ल.घ.फु. जलसाठा यात वापरला गेला. रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन दहिगाव व जामदा उजवा कालव्यातून थांबविण्यात आले आहे तर जामदा डावा व पांझण कालव्याचे आवर्तन शेवटच्या टप्प्यात आहे. दोन-चार दिवसात आवर्तनाचा शेवट होईल. गिरणा धरणातून मंगळवारपासून आवर्तनाचे पाणी कमी करण्यात येवून ५०० क्युसेसने सोडले जात आहे. ते जामदा डावा कालव्यातून तळई फाट्याच्या शेवटच्या सिंचनासाठी वापरले जात आहे. ते आटोपताच गिरणा धरणातून आवर्तन बंद होईल.
उन्हाळी हंगाच्या नियोजनाअभावी पाणी मागणीत घट
मागील व यावर्षी असे लागोपाठ दोन वर्षात गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झाला. त्याचप्रमाणे गिरणा लाभक्षेत्रातदेखील चांगला पावसाळा झाल्याने, विहिरींना जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी टिकेल, अशी स्थिती होती. हे पाहता पालकमंत्री, पाटबंधारे विभाग, कालवा समिती यांनी उन्हाळी हंगामाचे नियोजन करायला हवे होते. उन्हाळ्यात विहीरींचे पाणी कमी होते.यामुळे कालव्याचे पाणी मागणीत निश्चितच वाढ अपेक्षित होती.निदान मागील वर्षाच्या अनुभवानुसार तरी यावर्षी उन्हाळी हंगामाचे नियोजन करण्याची गरज होती.परंतु मागील पानावरुन पुढे चालू या पध्दतीने रब्बीचाच २८फेब्रुवारीचाच पाढा वाचला गेला.मागील वर्षी २७००० हेक्टरवर क्षेत्र भिजल्याचे (पाणी मागणी अर्ज आल्याचे) सांगितले गेले. यावर्षी तीस-या पाण्यानंतरची शाखा परत्वे मागणी क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी २१०००-२२००० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी आजवर झाल्याचा अंदाज आहे. गिरणा धरणाची रब्बीत एक लाख हेक्टरवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सिंचनक्षमता असतांना दुप्पट -तिप्पट पाणी मागणी का घटली? यावरुन उन्हाळी हंगामाचे नियोजन सुरवातीलाच व्हायला हवे होते. याचा विचार नियोजन कर्त्यांनी करायला हवा.
५० टक्के पाण्याचे काय करायचे?
गिरणा धरणात जवळजवळ ५० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पुढील चार-पाच महिने पिण्यासाठी राखीव ठेवूनही पाणी शिल्लक राहणार आहे. गहू, हरभरा आता पक्व झालेला आहे. पाच तालुक्यात उशिराने पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज खरोखर आहे काय?ते क्षेत्र किती? त्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत काय? हे तपासणे आवश्यक आहे. विहिरींची सोय असलेल्यांनीच रब्बी-उन्हाळी ज्वारी, बाजरी घेण्याची रिस्क घेतली आहे. यातील निन्म्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्जच भरलेले नाहीत. कालव्यांना सोडलेल्या पाण्याचा आपसुक लाभ या शेतक-यांना होतो मग अर्ज भरण्याची तसदी ते घेत नाही.आता गिरणा धरणातील शिल्लक जलसाठा मागे ठेवायचा की या शेतक-यांसाठी सोडायचा? का २००६-२००८ या सालाप्रमाणे मे-जून असा उन्हाळी कपाशीचा फाँर्म्युला अंमलात आणायचा त्याप्रमाणे नियोजन आता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीBhadgaon भडगाव