शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जामनेर येथे होली महोत्सवातून संस्कारशील देश घडविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:46 IST

प.पू. श्यामचैतन्यजी महाराज यांचे मार्गदर्शन

जामनेर : गुरूदेव सेवा आश्रमतर्फे आयोजित रंगपंचमी होली महोत्सवात प.पू. श्यामचैतन्यजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना सत्संगाद्वारे संस्कारशील देश घडविण्याचा मार्ग सांगण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.गुरूदेव सेवा आश्रमद्वारे सर्वप्रथम होली नृत्य (फाग) सादर करण्यात आले. त्यात बहुलखेडा, कन्नड, उप्पलखेडा, महादेवमाळ, शंकरपुरा, जामठी, गोंदेगाव तांडा, लिहा तांडा, मांडवा, आंबेवडगाव हिंगणे, कोकडी, यासह असंख्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंजारा समाजातील महिलांनी आपल्या पारंपारिक वेशभुषेतून तसेच होळी गीतातून होळीचे महत्त्व पटवून दिले. या फाग नृत्यात शेकडो पुरूषांनी, महिलांनी सहभाग घेतला.फाग नृत्यात प.पू. श्यामचैतन्यजी महाराज यांनीही ठेका धरला, त्या वेळी उपस्थितांनीही या क्षणांचा आनंद घेतला. त्यानंतर प.पू.श्यामचैतन्यजी महाराज यांनी सत्संगाद्वारे व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुणहत्या, आत्महत्या, गुन्हेगारीकरण, निरक्षरता यावर जोरदार प्रहार करीत संस्कृती टिकवण्यासाठी होलीचे महत्त्व सांगितले. सोबतच रक्तदान व अवयवदानाचेही महत्त्व त्यांनी विषद केले.यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, डॉ.नंदलाल पाटील, रवी महाजन, डॉ.सुभाष पवार, गणेश राठोड, मनोज जाधव, राधेश्याम राठोड, निमचंद चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रफुल्ल पाटील, मनोज महाजन, अनिल वाघ, डॉ.प्रकाश चव्हाण, हेमराज चव्हाण, पुखराज पवार, विजू महाराज, भिलाजी महाराज, खेमराज महाराज, निमचंद चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव व असंख्य भाविकभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश चव्हाण यांनी केले तर अक्षय जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव