शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पॅसेंजर बंद होऊन वर्षभरात मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:14 PM

२ आॅक्टोंबरपर्यंत सर्व रेल्वे स्टेशन होणार प्लॅस्टीकमुक्त

जळगाव : पॅसेंजर पेक्षा मेमू ट्रेनचा वेग जास्त आहे. या गाडीमध्ये प्रवासी बसण्याची क्षमताही जास्त आहे. ही गाडी सुुरु होण्यासाठी सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून, वर्षभरात सर्व मार्गावरच्या पॅसेंजर बंद होऊन मेमू ट्रेन धावतील, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. तसेच येत्या २ आॅक्टोंबरपर्यंत सर्व रेल्वे स्टेशन प्लास्टीकमुक्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. गुप्ता यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत सीनिअर डीसीएम आर. के. शर्मा, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी व प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य गनी मेमन उपस्थित होते. गुप्ता यांनी सांगितले की, मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ हे महत्वाचे स्टेशन असून दिल्लीसह पश्चिम भारतात जाणाºया सर्व गाड्या याच मार्गावरुन धावतात. या मार्गावर २४ तास गाड्यांची वर्दळ असते. गेल्या काही वर्षात तिपटीने गाड्यांची संख्या वाढली आहे. कृती कार्यक्रमात बहुतांश प्रश्न मार्गी प्रवाशांना दर्जेदार सुविधा व सुरक्षततेसाठी जून ते आॅगस्ट दरम्यान १०० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रत्येक स्टेशन वायफाय सुविधा व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मेमूचा कारखाना भुसावळला मंजूर मेमू ट्रेनचे डबे बनविण्याचा कारखाना भुसावळला मंजूर झाला असून, २५ एकरावर हा कारखाना उभा राहणार आहे. महाराष्ट्रात फक्त भुसावळ व नागपूरला हा कारखाना सुरु होत असून, मेमू ट्रेनच्या डब्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सर्व कामे या ठिकाणी होणार आहेत. विशेष म्हणजे यामुळे रोजगार निर्मिती वाढणार असून, वर्षभरात हा कारखाना सुुरु होईल. एलएचबी प्रकल्प उभारण्यासाठी जागा नाही रेल्वे मंत्रालयाने एलएचबी या अत्यानुधिक कोचेसचा प्रकल्प भुसावळला मंजुर केला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, या प्रकल्पासाठी १०० एकर एवढी जागा भुसावळला उपलब्ध नाही. यासाठी जागेचा शोध सुरु आहे.नुकतीच अकोला येथे या प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाच वर्षांत सर्व २०० फाटक बंद करणार रेल्वे प्रशसनाने रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यादां भुसावळ विभागात असणारे सर्व २०० ठिकाणचे फाटक येत्या ५ वर्षांत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फाटकांच्या ठिकाणी उड्डाणपूल व शक्य तिथे भूयारी गटारी बांधण्यात येत आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत २५ ठिकाणचे फाटक बंद करणार असून, पुढील वर्षी ५० ठिकाणचे फाटक बंद करण्याचे नियोजन आहे. तर पाच वर्षांत सर्व ठिकाणचे २०० फाटक बंद होतील. स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्प बसविणार रेल्वे मंत्रालयाने जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करण्यावर भर दिला असून, सध्या भुसावळ स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्यामुळे रेल्वेची भविष्यात मोठी विजेची बचत होणार आहे. भुसावळनंतर जळगाव, नाशिक, मनमाड, अकोला या सर्व स्टेशन हा प्रकल्प बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव