शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नीट परीक्षेच्या काही तासांआधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याचे तीव्र पडसाद ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नीट परीक्षेच्या काही तासांआधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. परिणामी, सोमवारी नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले जाऊन त्याला मंजुरीही देण्यात आली; परंतु या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालवू शकतो. शिवाय देशातील विद्यार्थ्यांना जर तामिळनाडूतील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तो मिळविण्यास त्यांना अडचणी येतील, त्यामुळे हा निर्णय योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया तज्ज्ञ व विद्यार्थ्यांमधून उमटल्या.

०००००००००००

काय आहे तामिळनाडू सरकारचा निर्णय

नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच अशीच मागणी विद्यार्थी, पालक आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. या विधेयकाद्वारे सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

काय म्हणतात... शिक्षणतज्ज्ञ

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडूच्या विधानसभेत पास झाले. यामुळे बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून याचा तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना तामिळनाडूतील महाविद्यालयात सीटस् मिळणार नाही. हे इतर राज्यातील मुलांसाठी नुकसानदायी ठरेल. वैद्यकीय प्रवेशासाठी देशात एकच व एकाच वेळी नीट परीक्षा होते; परंतु आता जर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी परीक्षा घेतली तर आधीसारखी परिस्थिती निर्माण होईल.

- डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ

०००००००००००

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा ही गरजेची आहे. जर नीट नाही घेतली तर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावेल. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ही काटेकोरपणे राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेशाची यादी ही तीन ठिकाणी पाठवावी लागते. त्याठिकाणी पडताळणी होते. त्यानंतर मान्यता मिळते. म्हणून तामिळनाडू सरकारचा निर्णय योग्य वाटत नाही.

- डॉ. नारायण आरवीकर, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ

००००००००००

नीट परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले तर चांगले महाविद्यालय मिळते. त्यामुळे ही परीक्षा गरजेची आहे. नुकतीच आपण नीट परीक्षा दिली आहे.

- वेदांत साबळे, विद्यार्थी

०००००००००

कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे नीट ही परीक्षा होणे गरजेचे होते. बारावीत अनेक मुलांना ९० टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत. त्यामुळे चांगल्या हुशार मुलांच्या जागासुद्धा यामुळे जातील. म्हणून नीट परीक्षा रद्द करायला नको होती.

- युगंधर शैलार, विद्यार्थी