शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नीट परीक्षेच्या काही तासांआधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याचे तीव्र पडसाद ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नीट परीक्षेच्या काही तासांआधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. परिणामी, सोमवारी नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले जाऊन त्याला मंजुरीही देण्यात आली; परंतु या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालवू शकतो. शिवाय देशातील विद्यार्थ्यांना जर तामिळनाडूतील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तो मिळविण्यास त्यांना अडचणी येतील, त्यामुळे हा निर्णय योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया तज्ज्ञ व विद्यार्थ्यांमधून उमटल्या.

०००००००००००

काय आहे तामिळनाडू सरकारचा निर्णय

नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच अशीच मागणी विद्यार्थी, पालक आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. या विधेयकाद्वारे सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

काय म्हणतात... शिक्षणतज्ज्ञ

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडूच्या विधानसभेत पास झाले. यामुळे बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून याचा तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना तामिळनाडूतील महाविद्यालयात सीटस् मिळणार नाही. हे इतर राज्यातील मुलांसाठी नुकसानदायी ठरेल. वैद्यकीय प्रवेशासाठी देशात एकच व एकाच वेळी नीट परीक्षा होते; परंतु आता जर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी परीक्षा घेतली तर आधीसारखी परिस्थिती निर्माण होईल.

- डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ

०००००००००००

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा ही गरजेची आहे. जर नीट नाही घेतली तर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावेल. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ही काटेकोरपणे राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेशाची यादी ही तीन ठिकाणी पाठवावी लागते. त्याठिकाणी पडताळणी होते. त्यानंतर मान्यता मिळते. म्हणून तामिळनाडू सरकारचा निर्णय योग्य वाटत नाही.

- डॉ. नारायण आरवीकर, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ

००००००००००

नीट परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले तर चांगले महाविद्यालय मिळते. त्यामुळे ही परीक्षा गरजेची आहे. नुकतीच आपण नीट परीक्षा दिली आहे.

- वेदांत साबळे, विद्यार्थी

०००००००००

कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यामुळे नीट ही परीक्षा होणे गरजेचे होते. बारावीत अनेक मुलांना ९० टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत. त्यामुळे चांगल्या हुशार मुलांच्या जागासुद्धा यामुळे जातील. म्हणून नीट परीक्षा रद्द करायला नको होती.

- युगंधर शैलार, विद्यार्थी