शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील अर्थसंकल्पाच्या वेळेस अनेकजण भाजपात येतील!; भाजपा नेत्याचा दावा

By ajay.patil | Updated: April 11, 2023 15:12 IST

राष्ट्रवादीसारख्या किंचित पक्षाला मोठे करण्यात अर्थ नाही!

अजय पाटील, जळगाव: यंदा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर, विरोधी पक्षातील अनेकांचे चेहरे पडले होते. त्यामुळे आता पुढील वर्षी अर्थसंकल्प मांडला जाईल, तोपर्यंत विरोधी पक्षातील अनेकजण भाजपच्या वाटेवर येतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी जळगाव शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपचे मेळावे व बैठका घेण्यात आल्या. त्याआधी शहरातील आयएमए सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, प्रदेश संघटक विजय चौधरी,  माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये परत येण्याबाबतची विनंती केली आहे का ? याबाबतचा प्रश्न बावनकुळे यांना उपस्थित केल्यानंतर, खडसेंनी आतापर्यंत पक्ष प्रवेशाबाबत कोणाचीही भेट घेतली नाही, किंवा खडसेंना पक्षाकडून देखील कोणतीही विचारणा झाली नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, आगामी काळात राज्यातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर राहतील असा दावा बावनकुळे यांनी केला.

काय म्हणाले बावनकुळे...?

१. कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, मेहनत पुर्ण घेतली होती. मात्र, यश मिळाले नाही. तसेच मतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, समोर आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये भाजपला मेहनत घ्यावी लागणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.२. आगामी सर्व निवडणुका भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये जर काही जागांवर दोन्ही पक्षाचे तुल्यबळ उमेदवार राहिले तर त्या ठिकाणी मैत्रिपुर्ण लढत आम्हाला खेळावी लागणार.३. देशात विरोधी पक्ष एकत्रित येत असले तरी ते विचारांनी एकत्रित येत नाही, किंवा देशाच्या भल्यासाठी एकत्रित येत नाही. ते केवळ भाजपला रोखण्यासाठी एकत्रित येत असल्याचे त्यांनी सांगितले.४. भाजपची वाट आधी देखील बिकट नव्हती, आता देखील नाही व भविष्यात  ही बिकट राहणार नाही. भाजपला २०१४ व २०१९ ज्या तुलनेत चांगले यश २०२४ मध्ये मिळणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

शरद पवारांना १०० जागा जिंकता आल्या नाहीत, राष्ट्रवादी म्हणजे किंचीत पक्ष

राष्ट्रवादी कॉग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आला, तो निवडणूक आयोगाने काढला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा किंचीत पक्ष आहे. शरद पवारांना राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणता आली नसून, त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर १०० जागा देखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे त्या पक्षाबाबत फारसे बोलणार नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा