शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोड्याने मारा; पण तुम्हीही युतीधर्म पाळा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 11:44 IST

Maharashtra Election 2019: गुलाबराव यांच्या मनातील राग त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता.

ठळक मुद्देदगाबाजी खपवून घेणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजनांना दिला. भाजपाचे बंडखोर 'भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार' म्हणून फलक मिरवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना दुर्लक्षित करण्याचं आवाहन केलं.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे धडाकेबाज नेते गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. गुलाबराव यांच्या मनातील राग त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. दगाबाजी खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. 

भाजपाचे बंडखोर 'भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार' म्हणून फलक मिरवत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. लोकसभेला तुम्ही दोन वेळा उमेदवार बदलला तरी आम्ही तुमच्या पाठीशी कायम राहिले. त्याचे हेच फळ आहे का?, असा रोखठोक सवाल गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना केला. भाजपाने बंडखोर आमदारांवर कारवाई करावी, असं पत्र स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे योग्य नाही. आम्ही बंडखोरी केली असेल, गद्दारी केली असेल तर मला गोळी मारा. जोड्याने मारा. आम्ही पाच वर्षं जनतेची कामे यासाठीच करतो का? तुम्ही आमची कारकीर्दच संपवायला निघाले, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यापैकी भाजपाकडून केवळ अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना केलं. मात्र तसं करता येणार नाही, असं महाजन यांनी सांगताच, दोघांमध्ये वाद सुरू झाला. सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि छायाचित्रकार तो टिपत होते. त्यातही गुलाबरावांचा संताप स्पष्ट दिसतो आहे.  

काय म्हणाले मुख्यमंत्री?

या सगळ्या प्रकरणानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना दुर्लक्षित करण्याचं आवाहन मतदारांना केलं. बंडखोरी करणाऱ्यांना कुणाचाही आशीर्वाद नाही, त्यामुळे पक्षचिन्ह असलेल्या उमेदवारांनाच निवडून द्या, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, गिरीश महाजन यांच्यासोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर गुलाबराव पाटील हे व्यासपीठावर न जाता समोर श्रोत्यांच्या खुर्चीवर बसले. अखेर श्रीराम खटाडे यांनी गिरीश महाजन व गुलाबरावांशी चर्चा करत समजूत घातली. त्यानंतर पाटील व्यासपीठावर गेले. शिवसेनेचे सर्वच उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेjalgaon-rural-acजळगाव ग्रामीणpachora-acपाचोराchopda-acचोपडा