शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'मी गद्दारी केली असेल तर गोळी घाला, जोड्याने मारा; पण तुम्हीही युतीधर्म पाळा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 11:44 IST

Maharashtra Election 2019: गुलाबराव यांच्या मनातील राग त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता.

ठळक मुद्देदगाबाजी खपवून घेणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजनांना दिला. भाजपाचे बंडखोर 'भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार' म्हणून फलक मिरवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना दुर्लक्षित करण्याचं आवाहन केलं.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे धडाकेबाज नेते गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. गुलाबराव यांच्या मनातील राग त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. दगाबाजी खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. 

भाजपाचे बंडखोर 'भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार' म्हणून फलक मिरवत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. लोकसभेला तुम्ही दोन वेळा उमेदवार बदलला तरी आम्ही तुमच्या पाठीशी कायम राहिले. त्याचे हेच फळ आहे का?, असा रोखठोक सवाल गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना केला. भाजपाने बंडखोर आमदारांवर कारवाई करावी, असं पत्र स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे योग्य नाही. आम्ही बंडखोरी केली असेल, गद्दारी केली असेल तर मला गोळी मारा. जोड्याने मारा. आम्ही पाच वर्षं जनतेची कामे यासाठीच करतो का? तुम्ही आमची कारकीर्दच संपवायला निघाले, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यापैकी भाजपाकडून केवळ अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना केलं. मात्र तसं करता येणार नाही, असं महाजन यांनी सांगताच, दोघांमध्ये वाद सुरू झाला. सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि छायाचित्रकार तो टिपत होते. त्यातही गुलाबरावांचा संताप स्पष्ट दिसतो आहे.  

काय म्हणाले मुख्यमंत्री?

या सगळ्या प्रकरणानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना दुर्लक्षित करण्याचं आवाहन मतदारांना केलं. बंडखोरी करणाऱ्यांना कुणाचाही आशीर्वाद नाही, त्यामुळे पक्षचिन्ह असलेल्या उमेदवारांनाच निवडून द्या, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, गिरीश महाजन यांच्यासोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर गुलाबराव पाटील हे व्यासपीठावर न जाता समोर श्रोत्यांच्या खुर्चीवर बसले. अखेर श्रीराम खटाडे यांनी गिरीश महाजन व गुलाबरावांशी चर्चा करत समजूत घातली. त्यानंतर पाटील व्यासपीठावर गेले. शिवसेनेचे सर्वच उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेjalgaon-rural-acजळगाव ग्रामीणpachora-acपाचोराchopda-acचोपडा