शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Maharashtra Election 2019: घातक राजकीय शक्तीचे निर्मूलन करा; शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 20:30 IST

कांद्याच्या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते.

जळगाव -  दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्राची पूजा करतो आणि या शस्त्राच्या माध्यमातून दृष्ट शक्तीचा नायनाट करतो, राज्यात सत्तेत भाजप शिवसेना युतीची घातक राजकीय शक्ती आहे, या शक्तीचे दसऱ्याच्या मुहूर्तावर निर्मूलन करा असं आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पारोळा येथे किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी  विधानसभेचे माजी  अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते 

शरद पवार म्हणाले की, कांद्याच्या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते. पण केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. शेतकऱ्यांने कांदा चाळीत किती आणि  घरात किती कांदा किती ठेवावा, याबाबत अट घातली. या मुळे कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांद्याचे भाव वाढलेत की सरकार हवालदिल होते पण शेतकरी आत्महत्या होते तेव्हा शासनकर्ते हवालदिल का होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित  केला 

मोठे उद्योजक कर्ज थकवितात तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी हे सरकार स्वतःच्या तिजोरीतून ते पैसे भरते. पण सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नसतो म्हणून या शेतकरी, युवक, नोकरदारांच्या विरोधातील या सरकारला घरी पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा