शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मविआसमोर महायुतीचा गड भेदण्याचे आव्हान; जळगाव जिल्ह्यात ११ जागांवर पाहायला मिळणार रस्सीखेच

By विलास बारी | Updated: October 24, 2024 08:04 IST

निवडणुकीतील ७ कळीचे मुद्दे

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील महायुतीचा मजबूत किल्ला भेदण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर राहणार आहे. जिल्ह्यातील ११ पैकी १० मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. तर एकच मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीत महायुतीचा जिल्ह्यातील बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काहीच दिवसात भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यातील सर्व ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. तर शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटानेही विद्यमान आमदारांनाच जळगाव जिल्ह्यात संधी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असताना, महायुतीच्या उमेदवारांकडून प्रचार, मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ११ जागांवर एकमत झालेले नव्हते. 

जिल्ह्यातील कोणती ताईनगर, रावेर जागा कोणत्या पक्षाकडे व कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार याबाबत महाविकास आघाडीकडून कोणताही निर्णय झालेला नव्हता. जिल्ह्यातील ११ जागांवर महायुतीत भाजप व शिंदेसेनेच्या वाट्याला प्रत्येकी ५ जागा आल्या आहेत. तर अजित पवार गटाला १ जागा मिळाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील चाळीसगाव, मुक्ताईनगर, पाचोरा, जळगाव ग्रामीण या जागांवर एकमत झाले आहे. मात्र, याबाबत मविआकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

निवडणुकीतील ७ कळीचे मुद्दे

- जळगाव जिल्ह्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

- भाजपकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना, ३७० कलम, देशाची अंतर्गत व अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाचाही मुद्दा या निवडणुकीत चर्चेचा राहणार आहे.

- केळी विकास महामंडळाची केवळ घोषणा झाली. तसेच शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला, मात्र अजूनही अंमलबजावणी नाही.

- नाशिक जिल्ह्यातील नार-पार या नद्यांचे पाणी गिरणा नदीत आणण्याचा महत्वाकांक्षी नार-पार प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला आहे.

- गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांची घोषणा होऊन १२ वर्ष झाली आहेत. मात्र, बलून बंधायांचा विषय मार्गी लागलेला नाही.

- तापी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्पही थंड बस्त्यात आहे. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत येतो.

- जळगाव जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड होते. मात्र, जिल्ह्यात कापसावरील प्रक्रिया उद्योग नाही. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकJalgaonजळगावmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती