शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्षांकडून जनतेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा ...

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा मोजायचे ऐकले होते; मात्र वसुली केलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन सापडणे, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडले, अशी टीका माजी कृषी व पणनमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे केली.

बुधवारी दुपारी १२ वाजता रयत क्रांती संघटनेतर्फे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण, संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे युवा जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ. हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, शेषराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, डॉ. अजय पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, लोकसंखेचा आकडा न देता आल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. वसुली करायला वेळ; मात्र ओबीसी जनगणना करायला वेळ नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. राज्यभरातील बळीराजा अनंत अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँका पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. बहुतांश ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी सोबतच मराठा-ओबीसी, बारा बलुतेदारवर्गाचा भ्रमनिरास झाला आहे. चळवळीत शेतकऱ्यांसाठी काम करत असताना माझ्यावर २५० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मंगेश चव्हाणसारखा आमदार तुमच्यासाठी अंगावर गुन्हे घेतो, जेलमध्ये जातो, हे जमिनीवरील कार्यकर्ताच करू शकतो.

शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहल सापनर या लहान मुलीने स्वागत गीत सादर केले.

जळगाव जिल्ह्यात ऊसाच्या भावाबाबत दुजाभाव

एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसाला ३ हजार रुपये भाव मिळत असताना इकडे जळगाव जिल्ह्यातील उसाला २३०० प्रमाणे भाव देऊनदेखील अजून पहिला हफ्ता सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमचे सरकार असताना साखरेचा भाव २९ रुपयावरून वरून ३२ रुपये केला, इथेनॉल १० वरून २० टक्के केले. सोयाबीन आयात बंद करून भाव दिला. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ रुपया अनुदान सुद्धा दिले नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार, आडत नियमनमुक्ती, संत शिरोमणी सावता माळी भाजीपाला बाजार अश्या योजना कृषी विभागाने राबवल्या; मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनादेखील भरपाई मिळालेली नाही. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतमजूर वर्गाला मदत नाही, पीकविम्याची भरपाई नाही. दवाखाने कर्जमुक्त झाले; मात्र सर्वसामान्य जनता शासनाच्या धोरणामुळे कोरोना काळात कर्जबाजारी झाली आहे, असा घणाघातही सदाभाऊ खोत यांनी केला.