शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्षांकडून जनतेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा ...

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा मोजायचे ऐकले होते; मात्र वसुली केलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन सापडणे, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडले, अशी टीका माजी कृषी व पणनमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे केली.

बुधवारी दुपारी १२ वाजता रयत क्रांती संघटनेतर्फे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण, संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे युवा जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ. हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, शेषराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, डॉ. अजय पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, लोकसंखेचा आकडा न देता आल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. वसुली करायला वेळ; मात्र ओबीसी जनगणना करायला वेळ नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. राज्यभरातील बळीराजा अनंत अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँका पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. बहुतांश ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी सोबतच मराठा-ओबीसी, बारा बलुतेदारवर्गाचा भ्रमनिरास झाला आहे. चळवळीत शेतकऱ्यांसाठी काम करत असताना माझ्यावर २५० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मंगेश चव्हाणसारखा आमदार तुमच्यासाठी अंगावर गुन्हे घेतो, जेलमध्ये जातो, हे जमिनीवरील कार्यकर्ताच करू शकतो.

शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहल सापनर या लहान मुलीने स्वागत गीत सादर केले.

जळगाव जिल्ह्यात ऊसाच्या भावाबाबत दुजाभाव

एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसाला ३ हजार रुपये भाव मिळत असताना इकडे जळगाव जिल्ह्यातील उसाला २३०० प्रमाणे भाव देऊनदेखील अजून पहिला हफ्ता सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमचे सरकार असताना साखरेचा भाव २९ रुपयावरून वरून ३२ रुपये केला, इथेनॉल १० वरून २० टक्के केले. सोयाबीन आयात बंद करून भाव दिला. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ रुपया अनुदान सुद्धा दिले नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार, आडत नियमनमुक्ती, संत शिरोमणी सावता माळी भाजीपाला बाजार अश्या योजना कृषी विभागाने राबवल्या; मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनादेखील भरपाई मिळालेली नाही. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतमजूर वर्गाला मदत नाही, पीकविम्याची भरपाई नाही. दवाखाने कर्जमुक्त झाले; मात्र सर्वसामान्य जनता शासनाच्या धोरणामुळे कोरोना काळात कर्जबाजारी झाली आहे, असा घणाघातही सदाभाऊ खोत यांनी केला.