शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्षांकडून जनतेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा ...

चाळीसगाव : राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लूट व वसुली सुरू करण्यात आली. आजवर हाताने नोटा मोजायचे ऐकले होते; मात्र वसुली केलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन सापडणे, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडले, अशी टीका माजी कृषी व पणनमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे केली.

बुधवारी दुपारी १२ वाजता रयत क्रांती संघटनेतर्फे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण, संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे युवा जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ. हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, शेषराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, डॉ. अजय पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, लोकसंखेचा आकडा न देता आल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. वसुली करायला वेळ; मात्र ओबीसी जनगणना करायला वेळ नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. राज्यभरातील बळीराजा अनंत अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँका पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. बहुतांश ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी सोबतच मराठा-ओबीसी, बारा बलुतेदारवर्गाचा भ्रमनिरास झाला आहे. चळवळीत शेतकऱ्यांसाठी काम करत असताना माझ्यावर २५० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मंगेश चव्हाणसारखा आमदार तुमच्यासाठी अंगावर गुन्हे घेतो, जेलमध्ये जातो, हे जमिनीवरील कार्यकर्ताच करू शकतो.

शालिग्राम निकम यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहल सापनर या लहान मुलीने स्वागत गीत सादर केले.

जळगाव जिल्ह्यात ऊसाच्या भावाबाबत दुजाभाव

एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसाला ३ हजार रुपये भाव मिळत असताना इकडे जळगाव जिल्ह्यातील उसाला २३०० प्रमाणे भाव देऊनदेखील अजून पहिला हफ्ता सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमचे सरकार असताना साखरेचा भाव २९ रुपयावरून वरून ३२ रुपये केला, इथेनॉल १० वरून २० टक्के केले. सोयाबीन आयात बंद करून भाव दिला. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ रुपया अनुदान सुद्धा दिले नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार, आडत नियमनमुक्ती, संत शिरोमणी सावता माळी भाजीपाला बाजार अश्या योजना कृषी विभागाने राबवल्या; मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनादेखील भरपाई मिळालेली नाही. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतमजूर वर्गाला मदत नाही, पीकविम्याची भरपाई नाही. दवाखाने कर्जमुक्त झाले; मात्र सर्वसामान्य जनता शासनाच्या धोरणामुळे कोरोना काळात कर्जबाजारी झाली आहे, असा घणाघातही सदाभाऊ खोत यांनी केला.