शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:31 IST

जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून अंतीम पैसेवारीदुष्काळ जाहीर न झालेल्या १०८ गावांचाही समावेशसंपूर्ण दुष्काळी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा

जळगाव : जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके आधीच दुष्काळी जाहीर झालेले असताना उर्वरीत एरंडोल व धरणगाव या दोन तालुक्यातील १५४ पैकी दुष्काळी जाहीर न झालेल्या १०८ गावांची आणेवारीदेखील ५० पैशांपेक्षा कमी जाहीर झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके देखील दुष्काळी जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील हंगामी पैसेवारी ५० च्या आत आली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. वगळलेल्या दोन तालुक्यापैकी एरंडोल तालुक्यातील कासोदा व उत्राण आणि धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळातही दुष्काळी परिस्थिती जाहिर करण्यात आली आहे. आता अंतीम पैसेवारीही ५० च्या आत आल्याने उर्वरीत दोन्ही तालुकेदेखील दुष्काळी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी जळगाव दौऱ्यातच याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली असून ज्या गावांना दुष्काळातून वगळण्यात आले आहे परंतू तेथील परिस्थिती खरोखरच गंभीर आहे, अशा गावांचा प्रस्ताव या समितीसमोर पाठवावा. समिती त्यावर विचार करून निर्णय घेणार आहे. दर सोमवारी ही समिती बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याने सोमवारी प्रस्तावबाबत सूचना जिल्हाधिकाºयांना केली होती. त्यातच आता पैसेवारीदेखील ५० च्या आत आल्याने हे दोन्ही तालुके संपूर्ण दुष्काळी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावdroughtदुष्काळFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज