शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या प्रश्नावर महापौर, आयुक्तांना कायदेशीर नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

महिनाभरात रस्ते दुरुस्ती करा, अन्यथा न्यायालयात दावा दाखल करणार : ॲड .प्रदीप कुलकर्णी यांचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

महिनाभरात रस्ते दुरुस्ती करा, अन्यथा न्यायालयात दावा दाखल करणार : ॲड .प्रदीप कुलकर्णी यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आता जळगावकरांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, मनपा व सत्ताधाऱ्यांविरोधात जळगावकरांचा रोष आंदोलन व निवेदनांमधून दिसून येत आहे. आता शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर ॲड. प्रदीप कुलकर्णी यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला असून, त्याआधी मनपा आयुक्त, महापौर व नगरविकास विभागाच्या सचिवांना देखील नोटीस बजाविण्यात आली आहे.

जनहित याचिका दाखल करण्याआधी ॲड. प्रदीप कुलकर्णी यांनी मनपा अधिनियमातील कलम ४८७ नुसार ज्यांना प्रतिवादी करण्यात येणार आहे. त्यांना नोटीस पाठविणे गरजेचे असल्याने ही नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, महापौर व आयुक्त म्हणून शहरातील नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, शहरातील लाखो नागरिक शहरातील खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे चुकविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. वाहनांचे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कंबरेचे व पाठीचे आजार देखील होत आहेत. या सर्व परिस्थितीला व हलगर्जीपणाला मनपा आयुक्त व महापौर जबाबदार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

राज्य शासनाने २०० कोटींचा निधी द्यावा

शासनाने महापालिकेला तीन वर्षांपूर्वी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, या निधीचे नियोजन मनपाला करता आले नाही. या निधीतून केवळ आणि केवळ रस्त्यांचीच कामे करण्यात यावीत. या निधीमधून इतर कोणतेही काम हाती घेण्यात येऊ नये असेही या नोटिशीमध्ये म्हटले आहे. तसेच या १०० कोटींमध्ये शहरातील रस्त्यांची समस्या मार्गी लागणार नसून, राज्य शासनाने अजून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

कोट..

शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय भयावह होत जात आहे. वाहन चालविताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. मनपा प्रशासन व महापौर ही समस्या मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता या समस्येबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच महापौर, आयुक्तांना नोटीस बजावली आहे. आता मनपाने नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

-ॲड. प्रदीप कुलकर्णी,