शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

जळगाव जिल्ह्यात ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:26 IST

पावसाच्या दडीने शेतकरी हवालदिल

ठळक मुद्देमूग, सोयाबीन,उडदाच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घटकेळी, कापसाच्या उत्पादनावरही होणार परिणाम

अजय पाटीलजळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे सुमारे ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी या पिकांच्या ५० टक्के उत्पादनात घट होणार आहे. अजून आठवडाभर पावसाने पाठ फिरवल्यास खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा पाऊस झाला मात्र, २७ जुलैपासून जिल्ह्णात पावसाची हजेरी नाही. त्यामुळे जिल्ह्णातील हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. जुलैमध्ये पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची स्थिती चांगली होती. मात्र, पिकांच्या ऐन वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीन, उडीदाचा फुलोरा देखील गळून पडून पडत आहे. आता पाऊस झाला तरी सोयाबीन, उडीद, मूूग या पिकांच्या उत्पादनात एकरी दोन क्विंटलने घट ही निश्चित आहे. शेतकऱ्यांना उंबरठा उत्पादन देखील मिळण्याची शक्यता नाही.आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाणारपावसाने दडी मारल्याने सध्या हलक्या जमिनीवर लागवड झालेला ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात असून, अजून आठ दिवस पावसाने दडी मारल्यास जिल्ह्णातील ११ ते १२ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम वाया जाण्याचा अंदाज आहे. काळी माती असलेल्या भागातील पिकांनी सध्या तग धरला असला तरी हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती खूप नाजूक आहे. काही शेतकºयांनी इतर बागायतदार शेतकºयांकडून पाणी घेत पिकांना पाणी दिले असलेतरी पिकांचीस्थिती सुधारलेली नाही.केळी, कापसाच्या उत्पादनावरही होणार परिणामखरीप हंगामासह पावसाअभावी केळी व कापसावर देखील परिणाम होणार आहे. कापूस लागवड झाल्यानंतर फुलोराच्या काळातच कापसावर बोंडअळी, मोहाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू जमिनीवरील कापसासह बागायती कापसाच्या पिकावर देखील परिणाम झाला आहे. तसेच केळीच्या निसवनीच्या काळातच पाऊस नसल्याने ‘अमृतपाणी’ मिळत नसल्याने केळीच्या घड येण्याची प्रक्रिया थांबली असल्याने केळी उत्पादकांना फटका बसणार आहे.आॅगस्ट महिन्यात पाऊसच नाहीखरीप हंगामासाठी जुलैमध्ये सरासरी २०६ मीमी पावसाची गरज असते. मात्र, जुलैमध्ये जिल्ह्णात १३० मिमी पाऊस झाला. आॅगस्टमध्ये १८७ मीमीची गरज असते, मात्र आॅगस्टमध्ये पाऊसच नसल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, यावल, अमळनेर, पारोळा, जामनेर या तालुक्यांसह जळगाव तालुक्यातील काही भागांमधील खरीप हंगामाला सर्वाधिक फटका बसला असून, कृषी विभागाकडून भडगाव तालुक्यातील काही ठिकाणी पाहणी केली असता जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली असल्याची माहिती कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.पावसाअभावी जिल्ह्यातील ४ ते ५ हजार हेक्टर खरीपाचा हंगामावर परिणाम झाला आहे. तसेच अजून काही दिवस पावसाने पाठ फिरवली तर खरीप हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती खूप नाजूक आहे. सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे.-अनिल भोकरे, उपसंचालक, कृषी विभागजुलै महिन्यात पाऊस झाला असला तरी पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. आता पाऊस झाला तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण खरीप हंगामातील निम्म्याहून अधिक उत्पादनात घट झाली आहे. मात्र, परतीचा पाऊस झाल्यास रब्बीच्या हंगामासाठी लाभदायक ठरू शकतो.-कपील चौधरी, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव