शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:51 IST

रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली

कुंदन पाटील

जळगाव : घराला दारिद्र्याचा उंबरठा.मायबापाचं पोटही हातावर. म्हणून काम करुन शिकत जायचं, हा प्रवासच होता पाचवीला पूजलेला. म्हणून दहावीही झाली. गुणवत्ता होतीच पाठिशी. तंत्रनिकेतनला दिवसभर कॉलेजला जावं लागेल म्हणून प्रवेश टाळला आणि मु.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली आणि कालांतराने अख्खी ‘खाकी’च प्रेमात पडली. तेव्हा शिवणकलेच्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा...निखळ, नितळ आणि निर्मळपणे फडकणारा...नात्यातला जिव्हाळा जपणारा...

शंकर आसाराम माळी (वय ६९) असे या सुखकर धाग्याचे नाव. बालपणी दारिद्री असताना शिवणकाम करणाऱ्या शेजाऱ्याने हात दिला आणि कालांतराने कधीतरी मजुरीत भिजणाऱ्या हातांना शिवणकला पावली.१९६८ मध्ये शंकरराव शिवणकलेसाठी पाय कसरत करत गेले. दोघा-तिघा पोलिसांनी ‘खाकी’ शिवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनाही ‘शंकर’ पावले.१९८७ नंतर जिल्ह्यात येणारा प्रत्येक पोलीस अधीक्षकही शंकररावांना ‘वर्दी’ शिवण्यासाठी बोलावत गेले. टी.एस.भाल यांच्यापासूनचा हा प्रवास डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यापर्यंत कायम राहिला. या सर्वच अधिकाऱ्यांशी अतूटच्या धाग्याने जिव्हाळ्याचे नाते विणले आणि तो प्रवास कायम ठेवला.

भालच म्हटले, हे कोण?

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील ‘आयपीएस’ मेसवर एकदा शंकररावांना बोलावलं गेलं. निमित्त होतं टी.एस.भाल यांची ‘वर्दी’ शिवण्याचे. माप घेण्यासाठी शंकरराव मेसवर पोहोचले. मात्र भाल यांच्यासोबत शहरातील बडा व्यक्ती बसल्याकारणाने शंकररावांना रोखले गेले. बैठक आटोपल्यावर भाल बाहेर आले आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या शंकररावांना बघितले. ‘हे कोण’ असा प्रश्न सुरक्षारक्षकांना विचारला. तेव्हा ते तुमचे माप घेण्यासाठी आलेत म्हणून सांगितले गेले. तेव्हा भाल चिडले. ‘लोकं तर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मला इथं भेटायला येतात. शंकररावा तर माझ्या कामासाठी आले आहेत. त्यांना तुम्ही रोखले कसे, असा प्रश्न करुन त्यांनी संताप व्यक्त केला.

पटनायक म्हणायचे, मुलांना मापात ठेवा

अरुप पटनायकांच्या ‘वर्दी’चे माप घ्यायला गेल्यावर शंकररावही त्यांच्याशी जुळले होते.पटनायक त्यांना नेहमीच सांगायचे. मुलांना नीट शिकवा आणि त्यांच्या लग्नासाठी घाई करु नका. त्यांना करियर करु द्या, असा सल्ला नेहमी देत. आजही बिपीनकुमार सिंह, नवल बजाज, भूषणकुमार उपाध्याय, प्रविण साळुंखे, एस.जयकुमार, प्रकाश मुत्याळ, इशू सिंधू, मोक्षदा पाटील यांच्यासह अनेक जळगावहून बदलून गेलेले भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी शंकररावांच्या संपर्कात आहेत. कारण त्यांनी धागाच गुंफला आहे स्नेहभावाना.

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस