शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:51 IST

रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली

कुंदन पाटील

जळगाव : घराला दारिद्र्याचा उंबरठा.मायबापाचं पोटही हातावर. म्हणून काम करुन शिकत जायचं, हा प्रवासच होता पाचवीला पूजलेला. म्हणून दहावीही झाली. गुणवत्ता होतीच पाठिशी. तंत्रनिकेतनला दिवसभर कॉलेजला जावं लागेल म्हणून प्रवेश टाळला आणि मु.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली आणि कालांतराने अख्खी ‘खाकी’च प्रेमात पडली. तेव्हा शिवणकलेच्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा...निखळ, नितळ आणि निर्मळपणे फडकणारा...नात्यातला जिव्हाळा जपणारा...

शंकर आसाराम माळी (वय ६९) असे या सुखकर धाग्याचे नाव. बालपणी दारिद्री असताना शिवणकाम करणाऱ्या शेजाऱ्याने हात दिला आणि कालांतराने कधीतरी मजुरीत भिजणाऱ्या हातांना शिवणकला पावली.१९६८ मध्ये शंकरराव शिवणकलेसाठी पाय कसरत करत गेले. दोघा-तिघा पोलिसांनी ‘खाकी’ शिवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनाही ‘शंकर’ पावले.१९८७ नंतर जिल्ह्यात येणारा प्रत्येक पोलीस अधीक्षकही शंकररावांना ‘वर्दी’ शिवण्यासाठी बोलावत गेले. टी.एस.भाल यांच्यापासूनचा हा प्रवास डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यापर्यंत कायम राहिला. या सर्वच अधिकाऱ्यांशी अतूटच्या धाग्याने जिव्हाळ्याचे नाते विणले आणि तो प्रवास कायम ठेवला.

भालच म्हटले, हे कोण?

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील ‘आयपीएस’ मेसवर एकदा शंकररावांना बोलावलं गेलं. निमित्त होतं टी.एस.भाल यांची ‘वर्दी’ शिवण्याचे. माप घेण्यासाठी शंकरराव मेसवर पोहोचले. मात्र भाल यांच्यासोबत शहरातील बडा व्यक्ती बसल्याकारणाने शंकररावांना रोखले गेले. बैठक आटोपल्यावर भाल बाहेर आले आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या शंकररावांना बघितले. ‘हे कोण’ असा प्रश्न सुरक्षारक्षकांना विचारला. तेव्हा ते तुमचे माप घेण्यासाठी आलेत म्हणून सांगितले गेले. तेव्हा भाल चिडले. ‘लोकं तर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मला इथं भेटायला येतात. शंकररावा तर माझ्या कामासाठी आले आहेत. त्यांना तुम्ही रोखले कसे, असा प्रश्न करुन त्यांनी संताप व्यक्त केला.

पटनायक म्हणायचे, मुलांना मापात ठेवा

अरुप पटनायकांच्या ‘वर्दी’चे माप घ्यायला गेल्यावर शंकररावही त्यांच्याशी जुळले होते.पटनायक त्यांना नेहमीच सांगायचे. मुलांना नीट शिकवा आणि त्यांच्या लग्नासाठी घाई करु नका. त्यांना करियर करु द्या, असा सल्ला नेहमी देत. आजही बिपीनकुमार सिंह, नवल बजाज, भूषणकुमार उपाध्याय, प्रविण साळुंखे, एस.जयकुमार, प्रकाश मुत्याळ, इशू सिंधू, मोक्षदा पाटील यांच्यासह अनेक जळगावहून बदलून गेलेले भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी शंकररावांच्या संपर्कात आहेत. कारण त्यांनी धागाच गुंफला आहे स्नेहभावाना.

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस