शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:51 IST

रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली

कुंदन पाटील

जळगाव : घराला दारिद्र्याचा उंबरठा.मायबापाचं पोटही हातावर. म्हणून काम करुन शिकत जायचं, हा प्रवासच होता पाचवीला पूजलेला. म्हणून दहावीही झाली. गुणवत्ता होतीच पाठिशी. तंत्रनिकेतनला दिवसभर कॉलेजला जावं लागेल म्हणून प्रवेश टाळला आणि मु.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली आणि कालांतराने अख्खी ‘खाकी’च प्रेमात पडली. तेव्हा शिवणकलेच्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा...निखळ, नितळ आणि निर्मळपणे फडकणारा...नात्यातला जिव्हाळा जपणारा...

शंकर आसाराम माळी (वय ६९) असे या सुखकर धाग्याचे नाव. बालपणी दारिद्री असताना शिवणकाम करणाऱ्या शेजाऱ्याने हात दिला आणि कालांतराने कधीतरी मजुरीत भिजणाऱ्या हातांना शिवणकला पावली.१९६८ मध्ये शंकरराव शिवणकलेसाठी पाय कसरत करत गेले. दोघा-तिघा पोलिसांनी ‘खाकी’ शिवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनाही ‘शंकर’ पावले.१९८७ नंतर जिल्ह्यात येणारा प्रत्येक पोलीस अधीक्षकही शंकररावांना ‘वर्दी’ शिवण्यासाठी बोलावत गेले. टी.एस.भाल यांच्यापासूनचा हा प्रवास डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यापर्यंत कायम राहिला. या सर्वच अधिकाऱ्यांशी अतूटच्या धाग्याने जिव्हाळ्याचे नाते विणले आणि तो प्रवास कायम ठेवला.

भालच म्हटले, हे कोण?

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील ‘आयपीएस’ मेसवर एकदा शंकररावांना बोलावलं गेलं. निमित्त होतं टी.एस.भाल यांची ‘वर्दी’ शिवण्याचे. माप घेण्यासाठी शंकरराव मेसवर पोहोचले. मात्र भाल यांच्यासोबत शहरातील बडा व्यक्ती बसल्याकारणाने शंकररावांना रोखले गेले. बैठक आटोपल्यावर भाल बाहेर आले आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या शंकररावांना बघितले. ‘हे कोण’ असा प्रश्न सुरक्षारक्षकांना विचारला. तेव्हा ते तुमचे माप घेण्यासाठी आलेत म्हणून सांगितले गेले. तेव्हा भाल चिडले. ‘लोकं तर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मला इथं भेटायला येतात. शंकररावा तर माझ्या कामासाठी आले आहेत. त्यांना तुम्ही रोखले कसे, असा प्रश्न करुन त्यांनी संताप व्यक्त केला.

पटनायक म्हणायचे, मुलांना मापात ठेवा

अरुप पटनायकांच्या ‘वर्दी’चे माप घ्यायला गेल्यावर शंकररावही त्यांच्याशी जुळले होते.पटनायक त्यांना नेहमीच सांगायचे. मुलांना नीट शिकवा आणि त्यांच्या लग्नासाठी घाई करु नका. त्यांना करियर करु द्या, असा सल्ला नेहमी देत. आजही बिपीनकुमार सिंह, नवल बजाज, भूषणकुमार उपाध्याय, प्रविण साळुंखे, एस.जयकुमार, प्रकाश मुत्याळ, इशू सिंधू, मोक्षदा पाटील यांच्यासह अनेक जळगावहून बदलून गेलेले भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी शंकररावांच्या संपर्कात आहेत. कारण त्यांनी धागाच गुंफला आहे स्नेहभावाना.

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस