शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’च्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:51 IST

रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली

कुंदन पाटील

जळगाव : घराला दारिद्र्याचा उंबरठा.मायबापाचं पोटही हातावर. म्हणून काम करुन शिकत जायचं, हा प्रवासच होता पाचवीला पूजलेला. म्हणून दहावीही झाली. गुणवत्ता होतीच पाठिशी. तंत्रनिकेतनला दिवसभर कॉलेजला जावं लागेल म्हणून प्रवेश टाळला आणि मु.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोजंदारीच्या हातांनी शिवणयंत्रावर धागा विणायला सुरुवात केली आणि कालांतराने अख्खी ‘खाकी’च प्रेमात पडली. तेव्हा शिवणकलेच्या शंकराचार्याने शिवला ऋणानुबंधाचा झेंडा...निखळ, नितळ आणि निर्मळपणे फडकणारा...नात्यातला जिव्हाळा जपणारा...

शंकर आसाराम माळी (वय ६९) असे या सुखकर धाग्याचे नाव. बालपणी दारिद्री असताना शिवणकाम करणाऱ्या शेजाऱ्याने हात दिला आणि कालांतराने कधीतरी मजुरीत भिजणाऱ्या हातांना शिवणकला पावली.१९६८ मध्ये शंकरराव शिवणकलेसाठी पाय कसरत करत गेले. दोघा-तिघा पोलिसांनी ‘खाकी’ शिवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनाही ‘शंकर’ पावले.१९८७ नंतर जिल्ह्यात येणारा प्रत्येक पोलीस अधीक्षकही शंकररावांना ‘वर्दी’ शिवण्यासाठी बोलावत गेले. टी.एस.भाल यांच्यापासूनचा हा प्रवास डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यापर्यंत कायम राहिला. या सर्वच अधिकाऱ्यांशी अतूटच्या धाग्याने जिव्हाळ्याचे नाते विणले आणि तो प्रवास कायम ठेवला.

भालच म्हटले, हे कोण?

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील ‘आयपीएस’ मेसवर एकदा शंकररावांना बोलावलं गेलं. निमित्त होतं टी.एस.भाल यांची ‘वर्दी’ शिवण्याचे. माप घेण्यासाठी शंकरराव मेसवर पोहोचले. मात्र भाल यांच्यासोबत शहरातील बडा व्यक्ती बसल्याकारणाने शंकररावांना रोखले गेले. बैठक आटोपल्यावर भाल बाहेर आले आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या शंकररावांना बघितले. ‘हे कोण’ असा प्रश्न सुरक्षारक्षकांना विचारला. तेव्हा ते तुमचे माप घेण्यासाठी आलेत म्हणून सांगितले गेले. तेव्हा भाल चिडले. ‘लोकं तर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मला इथं भेटायला येतात. शंकररावा तर माझ्या कामासाठी आले आहेत. त्यांना तुम्ही रोखले कसे, असा प्रश्न करुन त्यांनी संताप व्यक्त केला.

पटनायक म्हणायचे, मुलांना मापात ठेवा

अरुप पटनायकांच्या ‘वर्दी’चे माप घ्यायला गेल्यावर शंकररावही त्यांच्याशी जुळले होते.पटनायक त्यांना नेहमीच सांगायचे. मुलांना नीट शिकवा आणि त्यांच्या लग्नासाठी घाई करु नका. त्यांना करियर करु द्या, असा सल्ला नेहमी देत. आजही बिपीनकुमार सिंह, नवल बजाज, भूषणकुमार उपाध्याय, प्रविण साळुंखे, एस.जयकुमार, प्रकाश मुत्याळ, इशू सिंधू, मोक्षदा पाटील यांच्यासह अनेक जळगावहून बदलून गेलेले भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी शंकररावांच्या संपर्कात आहेत. कारण त्यांनी धागाच गुंफला आहे स्नेहभावाना.

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस