शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पगार थांबविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:30 IST

योजना प्रलंबित असल्याने तालुकास्तरावर कारवाई झाल्याची माहिती

जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील अभियंते व व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़ या योजना पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पगार होणार नाहीत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्याचे समजते़ अधिकाºयांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.१७८ योजना रखडलेल्यागेल्या पाच वर्षांपासून भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल अंतर्गत असलेल्या २८० योजना रखडल्या होत्या़ स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा समित्यांकडून झालेला विलंब, कामांत होणारी दिरंगाई यामुळे या योजना रखडल्या होत्या़ त्यापैकी १०२ योजनांची कामे गेल्या चार ते पाच महिन्यात मार्गी लागल्याची माहिती आहे़ मात्र, अद्यापही १७८ योजना प्रलंबित आहेत़ त्या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलल्याचे समजते़ शिवाय भारत निर्माण ही योजना बंद करून दुसरी योजना सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली असल्याने या योजनेतील रखडलेली कामे तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे, अन्यथा नव्या योजनेतून योजना मिळणार नाहीत, त्यामुळे तत्काळ या योजना मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनांचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश होते़ ते पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठा समित्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या़

टॅग्स :Jalgaonजळगाव