शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:39 IST

सीईओंच्या दालनासमोरील घटना

ठळक मुद्दे पाळधीच्या पाणी योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यावर कारवाई कराअधिका-यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न

जळगाव : भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारातील दोषींवर जिल्हा परिषदेने कारवाई न केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील पाळधी येथील संतप्त समाधान भिमराव पाटील या ग्रामस्थाने जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ जि.प. कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला़ ही घटना मंगळवारी दुपारी ४़४५ वाजता घडली़ याप्रकाराने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.अधिका-यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्नपाळधी येथील ग्रामस्थाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कळताच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे, ग्रा.पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन गाठत ग्रामस्थांची समजूत घातली़यावेळी ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून गावाला पाणी नाही़ ज्या भ्रष्टाचाºयांमुळे पाणी मिळत नाही त्यांना दोषी ठरविण्यात आले असताना त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली़ त्यानंतर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली. यावेळी ग्रामस्थ आपले गाºहाणे बोटे यांच्याकडे मांडत होते. तसेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील जिल्हा परिषदेत दाखल झाले होते़ अखेर दीड तास जि़प़मध्ये ठिय्या मांडल्यानंतर बुधवारी ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारींनी चर्चेसाठी बोलविण्यात आल्याच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतले़ आंदोलकांना शहर पोलीस ठाण्यात नेऊन समज देऊन सोडून देण्यात आले़गैरव्यवहारामुळे पाणी योजना बारगळलीआंदोलनकर्त्यांनी सांगितले की, पाळधी येथे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतंर्गत वाघूर धरणापासून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. २००८ पासून या योजनेचे काम पूर्ण होऊनही गावाला पाणी पुरवठा करण्यात येत नाही. यात गैरव्यवहार झाला असल्याने ही योजना बारगळली आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येऊन यात दोषी आढळलेले तत्कालीन ग्रामसेवक शरद घोंगडे, तत्कालीन सरपंच कमलाकर पाटील, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष लताबाई पाटील, सचिव शरद घोंगडे, शाखा अभियंता एस.बी. तायडे यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले होते.दिवसभरात अधिकारी न भेटल्याने ग्रामस्थ संतप्तसहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही दोषींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषींना पाठीशी घातले जात असल्याने संतप्त पाळधी येथील सरपंच नरेंद्र माळी, ग्रा़प़ंसदस्य भाऊराव माळी, ग्रामस्थ समाधान पाटील, संजय शेळके, योगेश भोंबे, योगेश पाटील यांनी सकाळपासून जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ दिवेकर हे कार्यालयात नसल्यामुळे संतप्त सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेबाहेर ठिय्या मांडला़ अखेर दिवसभरात ४ वेळा चकरा मारुनही मुख्य कार्यकारी अधिकाºयांची भेट होऊ न शकल्याने संतप्त ग्रामस्थ समाधान पाटील यांनी दुपारी ४़४५ वाजता दिवेकर यांच्या दालसमोर अंगावर रॉकेलने भरलेली कॅन ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जि़प़तील इतर कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्यानंतर अनर्थ टळला़पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यामुळे पाळधी येथील ग्रामस्थांकडून जि.प. सीईओंच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ बुधवारी त्यांना सीईओंनी चर्चा करण्यासाठी बोलविले आहे़-बी़ए़बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग़

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव