शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:39 IST

सीईओंच्या दालनासमोरील घटना

ठळक मुद्दे पाळधीच्या पाणी योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यावर कारवाई कराअधिका-यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न

जळगाव : भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारातील दोषींवर जिल्हा परिषदेने कारवाई न केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील पाळधी येथील संतप्त समाधान भिमराव पाटील या ग्रामस्थाने जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ जि.प. कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला़ ही घटना मंगळवारी दुपारी ४़४५ वाजता घडली़ याप्रकाराने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.अधिका-यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्नपाळधी येथील ग्रामस्थाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार कळताच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे, ग्रा.पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन गाठत ग्रामस्थांची समजूत घातली़यावेळी ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून गावाला पाणी नाही़ ज्या भ्रष्टाचाºयांमुळे पाणी मिळत नाही त्यांना दोषी ठरविण्यात आले असताना त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली़ त्यानंतर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली. यावेळी ग्रामस्थ आपले गाºहाणे बोटे यांच्याकडे मांडत होते. तसेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील जिल्हा परिषदेत दाखल झाले होते़ अखेर दीड तास जि़प़मध्ये ठिय्या मांडल्यानंतर बुधवारी ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारींनी चर्चेसाठी बोलविण्यात आल्याच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतले़ आंदोलकांना शहर पोलीस ठाण्यात नेऊन समज देऊन सोडून देण्यात आले़गैरव्यवहारामुळे पाणी योजना बारगळलीआंदोलनकर्त्यांनी सांगितले की, पाळधी येथे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतंर्गत वाघूर धरणापासून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. २००८ पासून या योजनेचे काम पूर्ण होऊनही गावाला पाणी पुरवठा करण्यात येत नाही. यात गैरव्यवहार झाला असल्याने ही योजना बारगळली आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येऊन यात दोषी आढळलेले तत्कालीन ग्रामसेवक शरद घोंगडे, तत्कालीन सरपंच कमलाकर पाटील, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष लताबाई पाटील, सचिव शरद घोंगडे, शाखा अभियंता एस.बी. तायडे यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले होते.दिवसभरात अधिकारी न भेटल्याने ग्रामस्थ संतप्तसहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही दोषींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषींना पाठीशी घातले जात असल्याने संतप्त पाळधी येथील सरपंच नरेंद्र माळी, ग्रा़प़ंसदस्य भाऊराव माळी, ग्रामस्थ समाधान पाटील, संजय शेळके, योगेश भोंबे, योगेश पाटील यांनी सकाळपासून जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ दिवेकर हे कार्यालयात नसल्यामुळे संतप्त सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेबाहेर ठिय्या मांडला़ अखेर दिवसभरात ४ वेळा चकरा मारुनही मुख्य कार्यकारी अधिकाºयांची भेट होऊ न शकल्याने संतप्त ग्रामस्थ समाधान पाटील यांनी दुपारी ४़४५ वाजता दिवेकर यांच्या दालसमोर अंगावर रॉकेलने भरलेली कॅन ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जि़प़तील इतर कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्यानंतर अनर्थ टळला़पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यामुळे पाळधी येथील ग्रामस्थांकडून जि.प. सीईओंच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ बुधवारी त्यांना सीईओंनी चर्चा करण्यासाठी बोलविले आहे़-बी़ए़बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग़

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव