शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पर्यवेक्षकाने केली विद्यार्थिनीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:52 IST

नंदीनीबाई विद्यालयातील प्रकार

ठळक मुद्दे वाद पोलिसातरॅगींगचीही केली विद्यार्थिनीने तक्रार

जळगाव : विद्यार्थिनींच्या दप्तरातून पेन व पैसे चोरी केल्याच्या तक्रारीवरुन पर्यवेक्षकांनी एका विद्यार्थिनीला चोर म्हणून हिणवत मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नंदीनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात घडली. दरम्यान, पालकांनाही तुमची मुलगी चोर आहे, तिला घेऊन जा असे या पर्यवेक्षकाने सुनावल्याने वाद वाढून तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला होता. रॅगींगचीही तक्रार विद्यार्थिनीने केली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील विद्यार्थिनी नंदीनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी पर्यवेक्षक एन. व्ही. महाजन यांनी या विद्यार्थिनीला मारहाण केली. हा प्रकार तिने घरी पालकांना सांगितला, त्यानंतर तिची आई व वडील शाळेत आले. पर्यवेक्षक महाजन यांना जाब विचारला असता ‘तुमची मुलगी चोर आहे, तिला घरी घेऊन जा’ अशा शब्दात पालकांना खडसावले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले.निरीक्षकांच्या दालनात भरली शाळाविद्यार्थिनी व तिच्या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुील गायकवाड यांनी पर्यवेक्षक महाजन यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी वर्गातील काही विद्यार्थिनींनी या विद्यार्थिंनीची आपल्याकडे चोरीची तक्रार केली. त्यानंतर तिच्या दप्तराची तपासणी केली असता त्यात पाचशे रुपये व पेन आढळून आले. याआधी दोन वर्षापूर्वीही याच विद्यार्थिनीची चोरीबाबत तक्रार झाली होती, असे महाजन यांना सांगितले. तर विद्यार्थिनी व पालकांनी हा आरोप फेटाळून लावत काही विद्यार्थिनी रॅगींग करीत असल्याची तक्रार केली.विद्यार्थिनी व तिच्या पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुील गायकवाड यांनी पर्यवेक्षक महाजन यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी वर्गातील काही विद्यार्थिनींनी या विद्यार्थिंनीची आपल्याकडे चोरीची तक्रार केली. त्यानंतर तिच्या दप्तराची तपासणी केली असता त्यात पाचशे रुपये व पेन आढळून आले. याआधी दोन वर्षापूर्वीही याच विद्यार्थिनीची चोरीबाबत तक्रार झाली होती, असे महाजन यांना सांगितले. तर विद्यार्थिनी व पालकांनी हा आरोप फेटाळून लावत काही विद्यार्थिनी रॅगींग करीत असल्याची तक्रार केली.शिक्षकांनी घेतली धावदोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पर्यवेक्षकांनाही समज दिली.काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद आपसात मिटविण्यात आला. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका, कार्यालय प्रमुख आर.आर.गुळवे यांच्यासह शिक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.ंविद्यार्थिनींनी तक्रार केल्याने विद्यालयाचा जबाबदार व्यक्ती या नात्याने विद्यार्थिनीला रागावलो. मारहाण केली नाही. रॅगींगचाही आरोप खोटा आहे. या विद्यार्थिनीबाबत अनेक तक्रारी होत्या.-एन.व्ही महाजन, पर्यवेक्षक

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव